शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

भीमा नदीवरील पूल मोजतोय घटका

By admin | Published: August 06, 2016 1:01 AM

भीमा नदीवर असलेला पूल शेवटची आऊट घटका मोजत असून, हा पूल कधी कोसळेल आणि वाहनांना कधी जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही

दौंड : दौंड-नगर रस्त्यावर भीमा नदीवर असलेला पूल शेवटची आऊट घटका मोजत असून, हा पूल कधी कोसळेल आणि वाहनांना कधी जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. तरीदेखील शासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलावरून वाहतुकीची वर्दळ सुरूच आहे. शासनाला या पुलाची डागडुजी करण्यासाठी वेळ नसल्याची वस्तुस्थिती आहे. मुळातच पुलावरील अरुंद रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्यासह पुलाचे खांब झिजत चालले आहेत. एखादे मोठे वाहन भरधाव या पुलावरून गेल्यावर पुलाला हादरे बसतात.सदरचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला आहे. या पुलासंदर्भात वेळोवेळी खबरदारीचे उपाय म्हणून ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र, केवळ शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा पूल कमकुवत होत चालला आहे. श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जाण्यासाठी राज्य आणि परराज्यातील भाविकांना याच पुलावरून प्रवास करावा लागतो. तसेच अन्य मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी हा एकमेव पूल आहे. या पुलासंदर्भात विपरित घटना घडली, तर नवीन पूल तयार होईपर्यंत दौंड-नगर वाहतूक बंद राहील. यात सर्वसामान्य जनतेसह शासनाचेही नुकसान होऊ शकते. या पुलाव्यतिरिक्त नगरकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. (वार्ताहर)>...तर वाहनांना जलसमाधी भीमा नदीवरील पुलाला पाहिजे तसे भक्कम संरक्षक कठडे नाहीत, तर या पुलावर रात्रीच्या वेळेला अंधाराचे साम्राज्य असते. एखाद्या वेळेस वाहनावरील चालकाचा ताबा सुटला, तर वाहन सरळ नदीत कोसळून विपरीत घडू शकते.