शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

खासदार बैठकीची ‘ती’ प्रथा खंडित!

By admin | Published: February 23, 2016 1:11 AM

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसमवेत होणाऱ्या बैठकीची प्रथा यंदा प्रथमच खंडित झाली असून राज्यातील प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना गांभिर्य

मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसमवेत होणाऱ्या बैठकीची प्रथा यंदा प्रथमच खंडित झाली असून राज्यातील प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना गांभिर्य नसल्याने त्यांनी ही बैठक टाळली, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अधिवेशनात खासदारांनी आपल्या राज्याशी संबंधित कुठले मुद्दे मांडावेत यावर विचारविनिमय करण्याकरता मुख्यमंत्री दरवर्षी अधिवेशनापूर्वी खासदारांसमवेत बैठक घेतात. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना या बैठकीला बोलविले जाते. राज्याचे कोणते विषय, मागण्या केंद्राकडे प्रलंबित आहेत या बाबतही खासदारांना माहिती दिली जाते. केंद्राकडे प्रलंबित असलेल्या मुद्यांची विशेष पुस्तिकाही खासदारांना दिली जाते. खासदार व राज्य शासन यांच्यातील समन्वयाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची असते. गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली ही प्रथा आहे. मात्र,यंदा ही बैठकच झाली नाही. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अधिवेशनापूर्वी अशी बैठक घेण्याची प्रथा आहे. त्यातून राज्याशी संबंधित विषयांचा पाठपुरावा केला जातो. मात्र मुख्यमंत्र्यांना गांभिर्य नसल्यानेच त्यांनी ही बैठक टाळली असावी. याबाबत काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी विचारणा केली असता ‘राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे ४२ खासदार आहेत आणि ते आम्हाला नेहमीच भेटत असतात. त्यामुळे बैठकीची गरज नाही, असे त्यांना सांगण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. शिवसेनेच्या काही खासदारांनीही ही बैठक न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्री कार्यालयाने केला खुलासा काही अपरिहार्य कारणामुळे ही बैठक घेता येता आली नाही. मात्र, केंद्राकडे प्रलंबित असलेल्या विषयांची विस्तृत अशी पुस्तिका राज्यातील सर्वपक्षीय खासदारांकडे पाठविण्यात आली आहे. या प्रलंबित मुद्यांचा राज्य सरकार सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा करीत असते, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला.