शहरं
Join us  
Trending Stories
1
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
3
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
4
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
5
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
6
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
7
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
8
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
9
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
10
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
11
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
12
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
13
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
14
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
15
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
16
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
17
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
18
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

मानसिक स्थैर्यासाठी संतसाहित्य उत्तम

By admin | Published: November 09, 2014 12:02 AM

सध्याचे जग हे स्पर्धेचे आहे, या चढाओढीत अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई सुरू आहे, यात प्रत्येकाचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.

पुणो :  सध्याचे जग हे स्पर्धेचे आहे, या चढाओढीत अस्तित्व सिद्ध करण्याची  लढाई सुरू आहे, यात प्रत्येकाचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.  मानसिक स्थैर्य मिळविण्यासाठी संतसाहित्य हा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच संचेती यांनी केले. 
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी विभागप्रमुख प्रा. अशोक कामत यांनी संपादित केलेल्या ‘निवडक सार्थ नामदेव’ या ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. गुरूकुल प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम कर्वे रस्त्यावरील स्वामी कृपा हॉल येथे पार पडला. याप्रसंगी संत नामदेव महाराजांचे विद्यमान वंशज ज्ञानेश्वर महाराज, ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे उपस्थित होते. 
डॉ. संचेती म्हणाले, संत साहित्यामधून संतांनी संस्काराची शिकवण दिली. पिढ्यानपिढ्या संस्काराची मुल्ये बदलत गेली तरी मूळ तत्व बदलत नाही. ज्ञानातून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर शहाणपण असावे लागते तेच देण्याचा प्रयत्न संतांनी केला. आचार-विचार यांची सांगड घातली की संवेदनशीलता निर्माण होते,  संतानी संतसाहित्यामधून ती संवेदनशीलता जागृत करण्याचे काम केले.
डॉ.  कामत म्हणाले, साहित्यिक हे कधीच राजकारण्यांना शरण जात नाहीत तर ते समाज समृद्ध करण्याचे काम करतात. साहित्य हे खर्-या अर्थाने विचार देण्याचे नव्हेतर तर आचार देण्याचे व्यासपीठ आहे.
लवकरच सर्वसामान्यांची जिज्ञासापूर्ती करण्यासाठी आणि अभ्यासक व संशोधकांना विश्लेषण करण्यासाठी दोन ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. याच साहित्याने आचाराचे उत्तम देणो दिले आहे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता पुणतांबेकर यांनी केले.  (प्रतिनिधी)