शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

कुपोषणबाबत मानसिकता ब्रिटिशांप्रमाणे

By admin | Published: October 15, 2016 4:21 AM

मेळघाट व राज्यातील अन्य आदिवासी विभागांना कुपोषणाच्या समस्येने वेढले असताना त्यावर उपाय म्हणून गेली आठ वर्षे उच्च न्यायालय राज्य सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर

मुंबई : मेळघाट व राज्यातील अन्य आदिवासी विभागांना कुपोषणाच्या समस्येने वेढले असताना त्यावर उपाय म्हणून गेली आठ वर्षे उच्च न्यायालय राज्य सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर आदेश देत आहे. मात्र संवेदनशीलता हरवलेल्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या व सनदी अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत बदल होत नसल्याने उच्च न्यायालयाने हतबलता व्यक्त केली. ब्रिटिशांना आदिवासी समाजाशी काहीही घेणे-देणे नव्हते, आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मंत्र्यांना आणि सनदी अधिकाऱ्यांनाही त्यांच्याशी काहीही घेणे-देणे नाही. आभाळच फाटले आता कुठे कुठे शिवणार? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने हतबलता व्यक्त केली. या सुनावणीवेळी ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीतील कुपोषणावरील लेखही न्यायालयासमोर सादर करण्यात आले. ‘ब्रिटिश सरकारने आदिवासी समाजाच्या समस्या जाणून घेण्यात कधीच रस दाखवला नाही. स्वातंत्र्य मिळाले असले तरी तीच मानसिकता कायम आहे. संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी व सनदी अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे. कधी कधी आम्हाला वाटते, की आम्ही जे करत आहोत ते व्यर्थ आहे,’अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारापुढे हतबलता व्यक्त केली.मेळघाट व राज्याच्या अन्य आदिवासी विभागांतील कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारला योग्य ते आदेश देण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीत सरकारतर्फे अ‍ॅड. नेहा भिडे यांनी खंडपीठापुढे आदिवासी विभागांसाठी मंजूर  करण्यात आलेल्या निधीची माहिती उच्च न्यायालयाला दिली. मेळघाट व आदिवासी विभागांसाठी आत्तापर्यंत किती निधी मंजूर करण्यात आला व कशा प्रकारे खर्च करण्यात आला, याची माहिती अ‍ॅड. भिडे यांनी दिली. अ‍ॅड. साने यांनीही कुपोषणामुळे अधिक बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. राज्य सरकार खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या या दाव्याला दुजोरा देण्यासाठी हे लेख उच्च न्यायालयात सादर केले. माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल, तर या दिग्गजांच्या म्हणण्याकडे तरी न्यायालयाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी म्हटले. उच्च न्यायालयाने त्यानंतर वास्तविकता भयाण असल्याचे म्हटले. राज्य सरकारनेही हे लेख वाचावेत, अशी सूचनाही खंडपीठाने सरकारला केली. कोट्यवधी रुपयांचा निधी योग्य गोष्टींसाठी खर्च न केल्याचे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने हा निधी सामान्य नागरिकांच्या करातून मिळत असल्याने ज्या गोष्टीसाठी निश्चित करण्यात आला आहे, त्यासाठी खर्च करावा, असा टोलाही सरकारला लगावला. न्यायालयाने सरकारला आदिवासी विभागांना देण्यात येणाऱ्या निधीची तसेच आश्रमशाळांच्या स्थितीची माहिती २५आॅक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)