शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा मृत्यूचा नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
2
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
3
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
4
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
5
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
6
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
7
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
8
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
10
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
12
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
13
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
14
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
15
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
16
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
17
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
18
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
19
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
20
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

हेतूबरोबरच पद्धतही चांगली हवी - उद्धव

By admin | Published: November 18, 2016 5:50 AM

नोटाबंदीचा सरकारचा निर्णय चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीची पद्धतही चांगली हवी

मुंबई : काळा पैसा, भ्रष्टाचार आणि नकली नोटांविरोधातील लढाई याबाबतीत आम्ही सरकारच्या बाजूनेच आहोत. मात्र ज्याच्या विरोधात लढाई आहे, त्यांनाच लक्ष्य करायला हवे. नोटाबंदीचा सरकारचा निर्णय चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीची पद्धतही चांगली हवी, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवाजी पार्क येथील दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. नोटाबंदीमुळे देशभर सामान्य लोकांच्या ज्या हालअपेष्टा सुरू आहेत त्या अशाच चालू राहिल्या तर देशात अराजक निर्माण होईल, असे आपण राजनाथ सिंह यांना सांगितले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदी विरोधात काढलेल्या मोर्चात शिवसेना सहभागी झाली होती. यानंतर राजनाथ सिंह यांनी उद्धव यांना बुधवारी रात्री दूरध्वनी केला होता. (प्रतिनिधी)