शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

‘मेट्रो ३’ प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार

By admin | Published: April 02, 2016 1:45 AM

मेट्रो ३ ही विशेष योजना आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागत असून हा प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. योजना बदलली तरी २,३०० नाही

मुंबई : मेट्रो ३ ही विशेष योजना आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागत असून हा प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. योजना बदलली तरी २,३०० नाही; तर ३५० झाडे तोडावीच लागणार. तरीही हा प्रकल्प पर्यावरण आणि प्रदूषण कमी करणारा ठरणार आहे. मी मुंबईच्या वाहतुकीत आमूलाग्र बदल करून निवृत्तीनंतर नागपूरला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.झाडे वाचविण्यासाठी दलदलीची पर्यायी जागा घ्यावी लागणार आणि त्यासाठी दीड हजार कोटींचा अधिक भार पडेल, हा पैसा जनतेच्या खिशातूनच जाणार. त्याचा परिणाम तिकिटावर होईल. त्यामुळे आरेतून मेट्रो ३ जाणे सयुक्तिक आहे. पर्यावरणाचा विचार करता झाडे ही कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. पण हा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी सार्वजनिक परिवहन हा सर्वांत उत्तम मार्ग आणि त्यातही मेट्रो हे सर्वोत्तम माध्यम समजले जाते, असे मुख्यमंत्री म्हणाले.इतर मुद्द्यांविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र ही योजना आम्ही राबवत आहोत. यात एका वर्षात १०० शहरे हागणदारीमुक्त केली आहेत. १० शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली. पुणे आणि सोलापूर वगळता इतर ८ शहरांना निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय, केंद्राचा निधीही त्यांनाच देण्यात येणार आहे. ज्या महापालिका सरकारचा निधी घेऊन योजना वेळेपूर्वी पूर्ण करतील त्यांना बोनस निधी दिला जाणार आहे. तर ज्या योजना उशिरा पूर्ण होतील त्यांना आर्थिक दंड केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. एमआयडीसी, वीजप्रकल्पांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी पुरविले जाईल. तेच प्रक्रिया केलेले पाणी त्यांनी वापरावे, असे बंधन घातले जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)आयव्हीआरसीएलच्या कामांची चौकशी कराकोलकाता येथे आयव्हीआरसीएल कंपनीने बांधलेला एक मोठा पूल कोसळला. या कंपनीच्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पांच्या कामांची तंत्रज्ञांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली. आयव्हीआरसीएल कंपनी काही अन्य कंपन्याबरोबर मिळून महाराष्ट्रातदेखील रस्त्यांची आणि अन्य प्रकल्पांची कामे करीत आहे. राज्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व कामांची तंत्रज्ञांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी केली.