शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

मध्यमवर्गीय जाती निर्मूलनापासून दूर

By admin | Published: May 16, 2016 1:47 AM

समाजातील सर्व घटकांनी जाती निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असताना तसे दिसून येत नाही

देहूरोड : समाजातील सर्व घटकांनी जाती निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असताना तसे दिसून येत नाही. उलट देशातील बहुसंख्य लोक मध्यमवर्गीय बनू लागले आहेत. आजचा मध्यमवर्गीय हा अत्यंत दुबळा, विचारहीन आणि संवेदनाहीन असून, जाती निर्मूलनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दिष्टांपासून खूप दूर चालला आहे, असे परखड मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी येथे व्यक्त केले. ज्येष्ठ आंबेडकरी अनुयायी व कामगार नेते काशिनाथ सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘एकच ध्यास धम्मभूमी देहूरोडचा विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन हभप रामदासमहाराज यांचे हस्ते झाले. त्या वेळी वैद्य बोलत होते. भन्ते राजरतन , पशुराम वाडेकर, दादासाहेब सोनवणे, मिलिंद भालेराव, कवी प्रा. बाबासाहेब जाधव, आकाश सोनवणे, आर. के. लोंढे, सी. डी. धस आदी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, डॉ आंबेडकर यांना हा देश जातीविरहित देश बनवायचा होता. त्यांनी जाती निर्मूलनासाठी लढणारी एक फळी तयार केली होती. वाघासारखी डरकाळी फोडून जाती व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम या फळीने करावे, असे त्यांचे स्वप्न होते. पण, दुर्दैवाने ज्यांनी हे करायचे होते, तेच आता जातीयवाद्यांच्या पुढ्यात बसले आहेत. घटनेच्या प्रास्ताविकेतील काही शब्द बदलले जात आहेत. याकडे दुर्लक्ष केले, तर एक दिवस संपूर्ण घटनाच बदली होईल. घटनेची रक्षण करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी आहे. प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या शब्दांप्रमाणे जातीविरहित हा शब्द घालण्याची गरज आहे. ह.भ.प. रामदासमहाराज म्हणाले, माणूस हा मानवतावाद सोडून अंधश्रद्धेमागे धावत आहे. (वार्ताहर)