शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

‘मिलिंद नार्वेकरांनी एकट्याने ५० टक्के शिवसेना संपवली, उद्धवजींना कळलंच नाही’, रामदास कदमांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 17:10 IST

Ramdas Kadam: जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. ५० टक्के शिवसेना एकट्या मिलिंद नार्वेकर यांनी संपवली आणि ते उद्धव ठाकरे यांना कळलंच नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यावर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी टीका केली आहे. जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. ५० टक्के शिवसेना एकट्या मिलिंद नार्वेकर यांनी संपवली आणि ते उद्धव ठाकरे यांना कळलंच नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रामदास कदम यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की,  ५० टक्के शिवसेना ही मिलिंद नार्वेकर यांनी संपवली. उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. कुठलीही व्यक्ती थेट उद्धव ठाकरेंना भेटली तर ते मिलिंद नार्वेकर यांना आवडत नसे. त्याचा काटा कसा काढायचा. त्याला पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटू द्यायचं नाही, याचं व्यवस्थित प्लॅनिंग मिलिंद नार्वेकर करायचे, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

तसेच उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांनीच त्यांचा घात केल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. ते म्हणाले की, जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरेंचा घात केला. मग सुभाष देसाई असतील. मिलिंद नार्वेकर असतील, आणखी काही मंडळींची नावं मी पुढे घेणार आहे. उद्धवजींच्या सोबत राहून त्यांना अंधारात ठेवून त्यांनी पक्षाचं नुकसान केलं. निवडणुका आल्या की, पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांना भेटा. मिलिंद नार्वेकरांना भेटण्याआधी कुणी थेट पुढे गेला तर त्याचं तिकीट कापलं गेलं म्हणून समजायचं, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कुणी बोलत नाही. आता मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? बोललं तर संपला तो माणून, आमदार असेल तर तिकिट नाही, नगरसेवक असेल तर तिकिट नाही, अशी परिस्थिती होती, असा दावा रामदास कदम यांनी केला.

दरम्यान, मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही बोलायचं नाही आहे. मात्र महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी काही गोष्टींचा खुलासा होणं आवश्यक आहे. मी आदित्य ठाकरेंना विचारतो की, शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर त्य़ांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का, शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते का? असा रोखठोक प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMilind Narvekarमिलिंद नार्वेकर