शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुधाला मिळणार २५ रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 06:07 IST

स्वाभिमानीचे आंदोलन मागे; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा

नागपूर : दूध उत्पादक शेतकºयांच्या आंदोलनाला यश आले असून, राज्य सरकारने दुधाला प्रतिलीटर २५ रुपये दर देण्याची घोषणा गुरुवारी केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन लगेच मागे घेतले आहे. हा निर्णय २१ जुलैपासून लागू होणार असून, दूध संघांना आता शेतकºयांना २५ रुपये भाव द्यावा लागेल. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत तशी घोषणा केली.दूध उत्पादक शेतकºयांना प्रतिलीटर ५ रुपये थेट अनुदान द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात ‘दूध बंद’ आंदोलन केले. त्याचा गुरुवारी चौथा दिवस होता. या काळात अनेक ठिकाणी दुधाचे टँकर रोखण्यात आले. मात्र मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये दूधटंचाई जाणवली नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात तातडीची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला.दिलेली वाढ समाधानकारकजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलताना मी तीन-चार पर्याय दिले होते. त्यातील एक पर्याय सरकारने आज स्वीकारला आहे. दूध उत्पादकांना सरकारने दिलेली वाढ समाधानकारक आहे. त्यामुळेच आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. - राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनाअसे मिळेल अनुदान-दुधाला प्रति लिटर २५ रुपये दर शेतकºयांना देणे दूध संघांना बंधनकारक आहे. राज्य सरकार पाच रुपये दूध संघांना देईल आणि दूध संघांकडून ते शेतकºयांना मिळतील.याची अंमलबजावणी २१ जुलैपासून होईल. राज्य सरकार दूध संस्थाना दूध भुकटीसाठी प्रति क्विंटल ५० रुपये तसेच दूध निर्यातीसाठी ५ रुपयांचे अनुदान देते. जे दूध संघ २५ रुपये दर देणार नाहीत त्यांचे हे अनुदान रोखले जाणार आहे.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाRaju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा