शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लाखो शेतकरी सावकारी कर्जाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 03:42 IST

राज्यात शेतकरी सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकला असल्याची माहिती सरकारने दिलेल्या उत्तरातूनच समोर आली आहे.

नागपूर : राज्यात शेतकरी सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकला असल्याची माहिती सरकारने दिलेल्या उत्तरातूनच समोर आली आहे. २०१७ या वर्षात १२,२१४ सावकारांनी १० लाख ९५ हजार ७०१ कर्जदारांना तब्बल १,६१५ कोटींचे कर्ज वितरित केले असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेतील प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. मात्र हे परवानाधारक सावकार असून सहकारी बँका, व्यापारी बँकांकडूनही कोट्यवधींचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले जाते. त्यामुळे शेतकरी सावकारांच्या जाळ्यात अडकत चालला आहे हे म्हणणे संयुक्तिक नसल्याचा दावाही सहकारमंत्र्यांनी उत्तरात केला आहे.कर्जमाफीच्या अटी जाचक असल्याने आणि शासनाचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी सावकारांकडून कर्ज काढत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे की, राज्यात ३१ मार्च २०१६ अखेर १२,२०७ परवानाधारक सावकारांनी १० लाख ८६ हजार २५६ शेतकरी व बिगर शेतकरी कर्जदारांना १,२५५ कोटींचे कर्ज वाटप केले तर २०१७ मध्ये १२,२१४ सावकारांनी १० लाख ९५ हजार ७०१ कर्जदारांना १,६१५ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि व्यापारी बँकांनी २०१६ मध्ये ५८.४७ लाख खातेदारांना रब्बी आणि खरीपासाठी ४०५८१ कोटींचे कर्ज वाटप केले तर २०१७ मध्ये ५७.८ लाख खातेदारांना दोन्ही हंगामासाठी ४२,१७२ कोटींचे कर्ज दिले आहे. त्यामुळे शेतकरी सावकारांच्या जाळ्यात अडकत चालला आहे हे म्हणणे संयुक्तिक नाही, असे देशमुख यांनी सांगितले आहे.देशमुख यांनी सांगितले की, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाच्या तरतुदीनुसार सावकारांना परवाने देण्यात येतात. तसेच कायद्याने विहित केलेल्या दरानुसार व्याज आकारणी करणे सावकारांना बंधनकारक आहे. बेकायदेशीर सावकारीबाबत प्राप्त होणाºया तक्रारीबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येते, असे देशमुख यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८