शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

निवडणूक हरलो, जिंकलो तरी...; मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:37 IST

आत्ताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत.

जळगाव - आमच्यावर बोलण्यासाठी काही लोकं सोडलेत, जा त्यांना बदनाम करा. कुणी कितीही आमच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत असाल तरी ३० वर्ष शिवसेना संघटना वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. निवडणूक हरलो, जिंकलो तरी खांद्यावरचा भगवा खाली उतरवला नाही. परंतु आता ३-४ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले लोकं आमच्यावर टीका करतायेत. आम्ही मंत्रिपद सोडून गुवाहाटीला गेलो. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे २०-२२ आमदार गेलो होतो. तुम्ही त्या आमदारांना परत बोलवा असं सांगितले. परंतु तुम्हाला जायचं तर जा असं आम्हाला म्हटलं. आपल्यामधून १ माणूस फुटत असला तर मला रात्रभर झोप लागत नाही. आमचा कार्यकर्ता निघून गेला तर आम्हाला वाईट वाटतं. त्याला थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथे ४० आमदार गेले तरी त्यांना जा असं म्हटलं गेले. त्यावेळी ४० आमदारांची किंमत त्यांना कळायला हवी होती. ५५ पैकी ४० आमदार बंड करतात तेव्हा त्यांचे म्हणणं ऐकलं पाहिजे होते. आता कुटुंबशाहीचं राजकारण राहिले नाही. सार्वजनिक विचार करणाऱ्याचं राजकारण सुरू आहे असंही त्यांनी सांगितले. 

आम्ही जनतेनं मान्य केलेले राजेआत्ताचा राजा राजाच्या पोटी जन्माला येत नाही. आत्ताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत. १९९९ पासून मी शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून येतोय. ९० साली पहिला आमदार देणारा आम्ही कार्यकर्ते आहोत. वानराची सेना आली असं म्हणून काँग्रेसवाले हिणवत होते. त्याच महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. मी दादा कोंडकेचा चित्रपट पाहणारा गावरान माणूस आहे. चुकून राजकारणात आलो. बाळासाहेबांच्या आशिर्वादाने इथवर आलोय असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. 

पाण्यात राजकारण करत नाहीआम्ही ५०-५० हजार मतांनी निवडून आलोय, आम्ही सगळ्यांना पाणी देतो. आता सार्वजनिक विचार करणाऱ्या नेत्यांचे राजकारण झाले आहे. पाण्याचे खाते मिळाल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा १५ हजार कोटींचा बजेट पाणी पुरवठा विभागाचा झाला. राज्यातील ३४ हजार गावांना पाणी पोहचवणार आहे. सगळ्या पक्षातील लोकांना आम्ही पाणी देतो. पाण्यात राजकारण करत नाही असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेGulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv Senaशिवसेना