शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"राजन साळवी नाही म्हणत होते पण आले ना"; वैभव नाईकांबाबत विचारताच संजय शिरसाटांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:47 IST

वैभव नाईक यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

Sanjay Shirsat: ठाकरे गटाचे राजापूर-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राजन साळवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक हे दोनच शिलेदार ठाकरेंकडे राहिले आहेत. अशातच वैभव नाईक हेदेखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर आता मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजन साळवी हे नाही म्हणता म्हणता शिवसेनेत आले असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर आणखी नेते पक्ष सोडणार असल्याचे म्हटलं जात आहे.राजन साळवी, रत्नागिरीचे माजी आमदार सुभाष बने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता वैभव नाईक हे देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पत्रकरांनी विचारले असता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.

"राजन साळवी सांगत होते की मी जाणार नाही. पण ते आले ना. वैभव नाईकही तेच सांगत आहेत. म्हणजे तुम्ही याचा अर्थ समजून घ्या हे जे काही येणारे आहेत ते सगळे नाही म्हणून येणारे आहेत. त्यामुळे भास्कर जाधव, वैभव नाईक यांच्यासह अनेक खासदार, आमदार हे केव्हा येणार आहेत याची तारीख तुम्हाला एकनाथ शिंदे सांगू शकतील. म्हणून वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला पाहिजे," असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटRajan Salviराजन साळवीVaibhav Naikवैभव नाईक Uddhav Thackerayउद्धव ठाकरे