शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

मंत्र्यांची अनास्था, अधिकारी विचारेनात, पतच घसरली; विधानसभेत सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:58 IST

अर्थसंकल्पातील अनुदानावरील चर्चेत सहभागी होत असताना उद्धव सेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मंत्र्यांना सभागृहाच्या कामकाजाचे गांभीर्य राहिलेले नाही...

मुंबई : विधानसभेत मंत्री हजर नाहीत म्हणून प्रश्न पुढे ढकलावे लागतात, लक्षवेधी सूचना मागे-पुढे कराव्या लागतात. मंत्र्यांची अशी अनास्था, तर आहेच, पण संबंधित खात्याचे अधिकारी हे अदृश्य गॅलरीत बसून पूर्वी मुद्दे लिहून घेत असत, तेही हल्ली होत नाही, अशी खंत सत्तारुढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी सभागृहात व्यक्त केली. त्यावर, मुख्य सचिवांना सरकारने आदेश द्यावेत, असे निर्देश तालिका अध्यक्ष दिलीप बनकर यांनी दिले.

अर्थसंकल्पातील अनुदानावरील चर्चेत सहभागी होत असताना उद्धव सेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मंत्र्यांना सभागृहाच्या कामकाजाचे गांभीर्य राहिलेले नाही. मंत्री सभागृहात बसत नाहीत. विधान परिषदेत कामकाज आहे, असे सांगून निघून जातात. पूर्वी गृह खात्यावर चर्चा सभागृहात व्हायची तेव्हा लॉबीमध्ये पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांपासून बडे अधिकारी बसून मुद्दे लिहून घेत असत.  पूर्वीसारखे आज तेथे सचिव वा त्यावरील दर्जाचे अधिकारी न बसता मंत्र्यांचे पीए, पीएस बसलेले असतात. सभागृहात मंत्री नाहीत, गॅलरीत अधिकारी नाहीत असेच चालले तर मग सभागृहातील सदस्यांच्या भावना सरकारच्या कानावर कशा जाणार, अशी चर्चा तर वांझोटीच ठरेल, असा हल्लाबोल जाधव यांनी केला. एखादी दुर्घटना घडली की, मंत्री पोहोचतात, पण सचिव कधीही जात नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुख्य सचिवांना आपबिती सांगासभागृहात मंत्री नसल्याने, अधिकारी दिसत नसल्याने आम्ही कसे हतबल आहोत, हे सर्वपक्षीय सदस्य पोटतिडकीने मांडत होते. सर्वांचा जास्त रोख होता तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच. त्याची दखल घेत तालिका अध्यक्षांनी याबाबत सरकारने मुख्य सचिवांनी योग्य ते आदेश द्यावेत, असे निर्देश दिले.

मंत्री झटकतात जबाबदारीशरद पवार गटाचे ज्येष्ठ सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली की, ज्यांच्या खात्यावर चर्चा सुरू आहे, ते मंत्री सभागृहात हजर नसतात. वेगळेच मंत्री मुद्दे लिहून घेत असल्याचे सांगतात. सरकारची ही सामूहिक जबाबदारी असल्याचे कारण देत मूळ मंत्री जबाबदारी झटकतात, हा या सर्वोच्च सभागृहाचा अपमान आहे. 

भाजपचे सुरेश धस म्हणाले, सहा वर्षे विधान परिषदेचा सदस्य होतो. तेव्हा विधान परिषदेची पत ठेवली जात नाही, अशी खंत व्यक्त करायचो, आता विधानसभेत आहे तर इथेही तीच स्थिती आहे, हे थांबले पाहिजे. ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनीही नाराजी बोलून दाखविली.

ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सदस्यांच्या भावना लक्षात घेत मंत्री वरच्या सभागृहात असले तरी संबंधित सचिवांनी गॅलरीत बसून नोंदी घेतल्या पाहिजेत आणि तसे निर्देश अध्यक्षांनी द्यावेत, अशी विनंती केली. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण