शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

बारावी निकालाच्या धास्तीनं सुसाईड नोट लिहून "ती" बेपत्ता

By admin | Published: May 25, 2017 10:00 AM

बारावीच्या परीक्षेत पास होणार की नाही, या भीतीपोटी एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील ही घटना आहे.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 25 - बारावीच्या परीक्षेत पास होणार की नाही, या भीतीपोटी एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील ही घटना आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी रवींद्र राजपूत ही तरुणी मंगळवारी (23 मे) पहाटे 5  वाजल्यापासून बेपत्ता आहे, शिवानी जुनी सांगवी येथील संगमगर येथील रहिवासी आहे.  गेल्या काही दिवसांपासून पुढील आठवड्यात बारावीचा निकाल लागेल, अशी अफवा पसरली असल्यामुळे तिने हे पाऊल उचलले असल्याचीही परिसरात चर्चा आहे.
 
"मला बारावीचे पेपर अवघड गेले आहेत. मला माहीत आहे की मी नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे." अशी चिठ्ठी लिहून शिवानी घरातून निघून गेली. याप्रकरणी शिवानीच्या वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची नोंद केली आहे. पण शिवानीबाबतची कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. 
 
 
(""अफवांवर विश्वास ठेऊ नका"")

दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दहावी, बारावीच्या निकालांच्या तारखांमुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमात होते. पण आता लवकरच बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. बोर्डाकडून बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून निकालाची तयारी सुरू आहे. निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून मे अखेरपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र अद्याप बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केली नसल्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेतली. राज्यातील ९ विभागीय मंडाळांतून ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थी बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. निकालाची कागदोपत्री तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. बारावीच्या परीक्षेचा निकाल मे अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, निकालाची वेळ आणि तारीख अजूनही बोर्डाने जाहीर केलेली नाही. लवकरच तारीख जाहीर करण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.