शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'एकनाथ शिंदेंजी, तारीख, वेळ आणि किती बुलडोजर आणायचे सांगा'; भाजप आमदाराचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 21:25 IST

भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात एक विधान केले. 

कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीने जोर धरला आहे. एकेरी उल्लेख टाळून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा बदल करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी कोल्हापूर ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला आहे. याची सुरूवात कोल्हापुरातून झाली असून, यावेळी बोलताना भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आमदार टी. राजा सिंह कोल्हापुरात बोलताना म्हणाले, "काल एकनाथ शिंदेंनी एक खूप चांगले विधान केले. ते म्हणाले, 'आम्ही तोडू औरंगजेबाची कबर.' तर एकनाथ शिंदेंनी मी विचारू इच्छितो की, शिंदेजी, तारीख सांगा, वेळ सांगा आणि हेही सांगा की आम्ही लोकांनी किती बुलडोजर सोबत आणायचे?"

"किती लाख कार्यकर्ते पाहिजे तेही सांगा. जी वेळ सांगाल, त्यावेळेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे लाखो मावळे, त्या जागी पोहोचतील. पण, आता बोलणं बंद झालं पाहिजे. आता बास्स झालं. आता औरंगजेबाची कबर काढली पाहिजे. औरंगजेबाचे नाव आणि निशाण महाराष्ट्रातूनच नाही, तर संपूर्ण भारतातून नष्ट झाले पाहिजेत", अशी मागणी त्यांनी केली.  

मुख्यमंत्र्यांनी मोदींना पत्र लिहावं - टी. राजा सिंह  

"मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तातडीने एक पत्र पंतप्रधान मोदींना लिहा. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत त्याची कबर आहे. लाखो रुपये... आपल्या सगळ्यांच्या आयकरातून गेलेला पैसा त्या औरंगजेबाच्या कबरीच्या देखरेखीसाठी वापरला जात आहे", असे टी राजा म्हणाले.

शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलला -टी. राजा सिंह

आमदार टी. राजा सिंह यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याच्या मागणीवर जोर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, हा मोर्चा मुंबईमध्ये येण्यापूर्वी त्यांनी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र