शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा

By यदू जोशी | Updated: October 25, 2024 08:41 IST

आज ईव्हीएमवर काही तासांतच निकाल लागतो. मात्र, पूर्वी मतपत्रिकांमुळे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागायचे.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कांटे की टक्कर, घासून झालेली निवडणूक, अत्यंत अटीतटीचा सामना असे शब्द समोर आले की आठवतात त्या राज्यातील अगदी कमी मतफरकाने फैसला झालेल्या विधानसभेच्या लढती. यातील बहुतेक निकालांना न्यायालयात आव्हान दिले गेले; पण त्या याचिका फेटाळल्या गेल्या. आज ईव्हीएमवर मतदान होते, पटापट कल कळतात आणि काही तासांतच निकाल लागतो. मात्र, पूर्वी मतपत्रिकांवर मतदान व्हायचे तेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागत. अवैध मतपत्रिकांबाबत उमेदवारांचे प्रतिनिधी आक्षेप घेत. त्याकाळी सहा मतांच्या फरकाने निकाल लागल्याची दोन उदाहरणे राज्यात आहेत.

१९७८ मध्ये जनता पक्षाची लाट असताना नांदेड जिल्ह्याच्या हदगाव मतदारसंघात या पक्षाचे निवृत्तीराव पवार यांनी काँग्रेसचे बापूराव शिंदे यांचा केवळ सहा मतांनी पराभव केला होता. १९९० मध्ये मध्य नागपूरने अशीच एक उत्कंठावर्धक लढत अनुभवली होती. जनता दलाचे डॉ. यशवंत बाजीराव यांनी काँग्रेसचे अनिस अहमद यांचा केवळ सहा मतांनी पराभव केला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले. फेरमतमोजणी करण्यात आली तरीही डॉ. बाजीराव जिंकले आणि त्यांचे सहाचे मताधिक्य कायम राहिले. अनिस अहमद पुढे जिंकत गेले; पण आजही चर्चा होते ती त्यांच्या त्या सहा मतांनी झालेल्या पराभवाची.

१०० ते ३०० मतांच्या फरकाने जिंकलेले २३ आमदार असे

  वर्ष    आमदार    पक्ष    मतदारसंघ      मताधिक्य    

  • १९८०    बाबूराव चाकोते    काँग्रेस    सोलापूर शहर उत्तर    १०१
  • १९८५    अण्णा जोशी    भाजप    शिवाजीनगर, पुणे    १११        
  • १९९०     गोविंदराव चौधरी    भाजप    साक्री    ११३ 
  • १९८०    शिवशंकर उटगे    काँग्रेस    औसा    ११४         
  • १९९०    महादू बबोरा    काँग्रेस    शहापूर    ११८ 
  • १९७८    दगडू गलांडे    जनता पक्ष    हिंगोली    १२१         
  • १९९५    अब्दुल कादीर देशमुख    काँग्रेस    परतूर    १२२ 
  • १९९९    संजय देशमुख    अपक्ष    दिग्रस    १२६ 
  • १९८०    प्रेमकुमार शर्मा    भाजप    खेतवाडी    १४० 
  • २००४    डॉ. सतीश पाटील    राष्ट्रवादी    पारोळा    १४७ 
  • २००९    धनराज महाले    शिवसेना    दिंडोरी    १४९ 
  • १९८०    माधवराव पवार    काँग्रेस    गेवराई    १५७ 
  • १९८५    शहाजीराव पाटील    काँग्रेस    मोहोळ    १६७ 
  • १९८५    विठ्ठल तुपे    जनता पक्ष    पुणे कॅन्टोन्मेंट    १७७ 
  • १९७८    जनार्दन बोंद्रे    काँग्रेस    चिखली    १७८ 
  • १९९५    शहाजीबापू पाटील    काँग्रेस    सांगोला    १९२ 
  • १९९९    कल्याणराव पाटील    शिवसेना    येवला    २२१ 
  • १९८०    रामचंद्र बेंडाळ    काँग्रेस    गुहागर    २२६ 
  • १९८५    सदाशिवराव मंडलिक    समाजवादी काँग्रेस    कागल    २३१ 
  • १९७८    कन्हय्यालाल नहार    अपक्ष    नांदगाव    २४३ 
  • २००४    कमल उल्हास ढोले पाटील    राष्ट्रवादी    भवानीपेठ    २५७ 
  • २०१४    नारायण पाटील    शिवसेना    करमाळा    २५७ 
  • २०१४    अर्जुन खोतकर    शिवसेना    जालना    २९६

३०० ते एक हजारच्या फरकाने जिंकले ९३ आमदार

राज्याच्या इतिहासात ९३ आमदार हे ३०० ते एक हजार दरम्यानच्या मताधिक्याने जिंकले. त्यात दिलीप सोपल, कुमार सप्तर्षी, जयप्रकाश दांडेगावकर, रोहिदास पाटील, पद्मसिंह पाटील, सूर्यकांता पाटील, जिवा पांडू गावित, सुभाष देसाई, विक्रमसिंह पाटणकर, हशू आडवाणी, नंतर राष्ट्रपतिपद भूषविलेल्या प्रतिभाताई पाटील, मधुकर सरपोतदार या बड्या नेत्यांचा समावेश होता. अर्थात आधीच्या वा नंतरच्या निवडणुकीत यापैकी बरेच जण अधिकच्या फरकाने जिंकले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभा