शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
3
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
4
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
5
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
7
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
8
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
9
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
10
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
11
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
12
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
13
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
14
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
15
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
16
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
18
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
19
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
20
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

५०-५० कोटी देऊन आमदार, खासदार फोडले; राहुल गांधींचा दावा, ठाकरे गटातील...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 3:47 PM

गांधी, नेहरू, पटेल वर्षभर जेलमध्ये राहिले परंतु त्यांनी इंग्रजांच्या पत्रावर सही केली नाही. सावरकरांनी केली असं राहुल गांधी म्हणाले.

अकोला -  माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार भारत जोडो यात्रेत चालत होते. त्यांना ५० कोटींची ऑफर होती असं म्हणाले. ते गेले नाहीत पण बाकीचे गेले. एकप्रकारे विरोधकांमध्ये साफसफाई होत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत १०-१५ कोटी घेऊन चाललेल चांगली बाब आहे. भारतात स्वच्छ नेत्यांची कमी नाही त्यामुळे ते आमच्यासोबत येतील असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा आम्ही विदर्भाच्या सीमेवर होतो. तेव्हा आमच्या लोकांनी म्हटलं की, तुम्हाला गीत ऐकवायचं आहे. महात्मा गांधी वर्धाला गेले का? असा मला प्रश्न होतो. भारतात इतर जागा होत्या मग इथे का? असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा गीत ऐकल्यानंतर मी त्या गेटच्या आतमध्येच जात मला सर्व समजलं. काँग्रेसची विचारधारा आहे ती विदर्भात आहे. जो नैसर्गिक काँग्रेसी आहेत ते विदर्भात आहेत असं त्यांनी सांगितले. 

सावरकर घाबरले होतेगांधी, नेहरू, पटेल वर्षभर जेलमध्ये राहिले परंतु त्यांनी इंग्रजांच्या पत्रावर सही केली नाही. सावरकरांनी केली. कारण त्यांच्या मनात भीती होती. जर भीती नसती तर त्यांनी सही केली नसती. ज्यावेळी सावरकरांनी सही केली तेव्हा भारतातील नेत्यांचा विश्वासघात केला. दोन विचारधारा आहे. मला तुमचा सेवक बनायचंय हे सावरकरांनी पत्रात इंग्रजांना लिहिलं होतं असं राहुल गांधींनी म्हटलं. 

देशासमोरच्या महत्त्वाच्या समस्या कोणत्या?युवकांना रोजगार मिळेल असा त्यांना विश्वास नाही. मला भेटलेल्या युवकांमध्ये एकही युवक भेटला नाही जो आत्मविश्वसाने मला नोकरी मिळेल असं म्हटलं नाही ही देशातील मोठी समस्या आहे. महागाई वाढतेय. तरुणांचे भविष्य बंद आहे. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना कुठलेही मदत नाही. शेतीमालाला भाव मिळत नाही. कर्ज माफ होत नाही. सरकारी हॉस्पिटल, शाळा-कॉलेज बंद करतायेत. गॅस सिलेंडर महाग झाला. पेट्रोल दर वाढले. सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे कुठे जातायेत याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे असंही राहुल गांधी म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना