शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

Raj Thackeray:...अन् उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाचा साक्षात्कार झाला; राज ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 8:24 PM

MNS Gudhipadva Melava Raj Thackeray: व्यासपीठांवर एकमेकांना शिव्या घालून पुन्हा सत्तेसाठी मांडीवर जाऊन बसता. तुमच्या आतील झंगाटाशी आमच्याशी काय संबंध? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

मुंबई – २०१९ झालेली विधानसभा निवडणूक आठवा. भाजपा-शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला विशेषत: उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत भाषणात एकदाही बोलले नाही. पंतप्रधानासमोर भाषण केले तेव्हाही काही बोलले नाहीत. अमित शाह भाषणात म्हणाले मुख्यमंत्री भाजपाचा होईल. तेव्हाही काही बोलले नाही. मात्र निकाल लागल्यानंतर आपल्यामुळे सरकार अडकतंय हे लक्षात आले. त्यावेळी अडीच वर्षाची टूम काढली असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी शिवसेनेला लगावला.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, अमित शाहांशी एकांतात बोलला होता मग ते बाहेर का बोलला नाही. मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्राचं जनतेचे आहे. मग चार भिंतीत ही गोष्ट का केली? अमित शाह बोलतात आम्ही काही बोललो नाही. पहाटे शपथविधी झाला पाहतो तर जोडा वेगळाच होता. पळून कुणासोबत गेले लग्न कुणासोबत केले काहीच कळालं नाही. राज्यातील ३ नंबरचा पक्ष पहिल्या आणि दुसऱ्या पक्षाला फिरवतोय. व्यासपीठांवर एकमेकांना शिव्या घालून पुन्हा सत्तेसाठी मांडीवर जाऊन बसता. तुमच्या आतील झंगाटाशी आमच्याशी काय संबंध? असा सवाल त्यांनी केला.

तसेच ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केले ते शिवसेना-भाजपासाठी केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी नाही. मतदारांशी गद्दारी करण्याला कोणतं शासन करणार? कुणीही यावं जनतेला फरफटत न्यावं. हे विसरून जाता ना हेच हवं. सगळ्या गोष्टी आपण विसरतो. रोज नवनवीन बातम्या घडतात. मूळ विषय बाजूला न्यायचा असा आरोपही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला.

दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महाराष्ट्र सैनिकांचे दर्शन घेताना मला खूप आनंद होतोय. ३ वर्षापूर्वी ज्यावेळी इथं गुढीपाडवा मेळावा झाला. त्यानंतर २ वर्ष हा मेळावा घेता आला नाही. लॉकडाऊनचा काळ आठवला तर काही वेळ बरं वाटतं तर काही वेळा त्रास होतो. आज गजबजलेलं शिवतीर्थ सामसूम होतं. जगभरात शांतता होती. माणूसही दिसत नव्हता. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. त्यामुळे आजच्या सभेत थोडा फ्लॅशबॅक देऊ. २ वर्षापूर्वी झालेल्या घटना आपण विसरलो. तुम्ही विसरता तेच यांना फायद्याचं होतं. विस्मरणात जाऊन कसं चालेल असं म्हटलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना