शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...पण आजचे राजकारणी दिल्लीश्वरांपुढे कणाहीन; राज ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 09:38 IST

मुंबई : राज्यात 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी कामगार दिनहीही असततो. याच पार्श्वभूमीवर ...

ठळक मुद्देराज ठाकरे यांनी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर, कामगारांसंदर्भातही सरकारला प्रश्न विचारला आहेदेशात महाराष्ट्राचे महत्त्व कमी केल्याचा ठपका राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारण्यावर ठेवला आहेदेशात सुरू असलेल्या लॉकडाउनसंदर्भातही राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे

मुंबई : राज्यात 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी कामगार दिनहीही असततो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारण्यांना टोला लगावला असून, कामगारांसंदर्भातही सरकारला प्रश्न विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी 'मनसे अधिकृत' या आपल्या ट्विटर अकाउंटवर काही ट्विट करत परखडपणे आपली भूमिका मांडली आहे.

देशात महाराष्ट्राचे महत्त्व कमी केल्याचा ठपका राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारण्यावर ठेवला आहे. यासंदर्भात केलेल्या एका ट्विटमध्ये राज म्हणता, 'जवळपास सव्वाशे वर्ष मराठ्यांनी ह्या देशावर राज्य केलं, अनेक विचारधारांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अनेक द्रष्टे नेते महाराष्ट्रातून दिल्लीत गेले, दिल्ली देखील महाराष्ट्राचं म्हणणं ऐकून घ्यायची पण आजचे राजकारणी दिल्लीश्वरांपुढे कणाहीन झालेत', असा टोला राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना लगावला आहे.

CoronaVirus, LockdownNews: छोट्या व्यवसायिकांना मोठा दिलासा, सरकारच्या आदेशानंतर 'ही' बँक देत आहे उधार पैसे

हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का?; राज ठाकरेंचा सवाल

कामगार दिनानिमित्त आणि देशात सुरू असलेल्या लॉकडाउन संदर्भातही राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. यात, "कोरोना टाळेबंदीमुळे देशात-राज्यात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतील. अनेक लोकं भुकेने बेजार झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रचंड चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, टीव्ही माध्यमं ह्या सर्वांचा विचार सरकार करणार का?", असा सवालही  त्यांनी उपस्थित केला आहे.  

CoronaVirus, LockdownNews : सरकार दुसऱ्यांदा आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत, मोदींची अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा

 

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसेPoliticsराजकारण