शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

लेख: धार्मिक तेढ कोण निर्माण करतंय?, महाराष्ट्राचं 'राज'कारण नीट समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 2:00 PM

राजसाहेबांबद्दल एक गोष्ट नक्की आहे " you can love him you can hate him but you can not ignore him"

- संदीप देशपांडे

२ एप्रिल २०२२ ची राजसाहेबांची गुढी पाडव्याची सभा ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरली. शिवतीर्थावरच्या या सभेनंतर अनेक ऊलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. मनसे हा संपलेला पक्ष आहे, आम्ही सुपारी घेतलेली आहे, मनसे नेहमी भूमिका बदलते, राजसाहेब हे सभा घेतात आणि मग गायब होतात अश्या अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. पण राजसाहेबांबद्दल एक गोष्ट नक्की आहे " you can love him you can hate him but you can not ignore him" त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही म्हणण्याऱ्या जाणता राजांना पत्रकार परिषद आणि प्रत्येक भाषणात उत्तर द्यावं लागलं. शिवसेनेची  तर अवस्था अशी झाली होती ती की, "रामचंद्र कहे गये सिया से ऐसा कलयुग आयेगा शिव की सेना कहेलेने वाला हनुमान चालीसा से डर जयेगा" 

12 एप्रिलला ठाण्यात राजसाहेबांची उत्तरसभा झाली त्या सभेत महाविकास आघाडीचे वाभाडे काढले आणि त्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण हे हनुमान चालीसा आणि भोंगे या दोन शब्दांच्या भोवतीच फिरत आहे. असो. मला या सगळ्यात एक प्रश्न पडतो तो असा की, आमच्यावर आरोप होतो की राजसाहेब हे धार्मिक तेढ पसरवण्याचं काम करतायत. मुळात प्रश्न असा आहे की आम्ही म्हणतोय 2005च्या सर्वोच न्यायालयाच्या आणि विविध उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन झालं पाहिजे. पण काही लोक म्हणतात की आम्ही या आदेशाचं पालन करणार नाही मग तेढ कोण निर्माण करतंय. आदेशाचं पालन करा म्हणणारे की करणार नाही म्हणणारे? 

महाराष्ट्र सरकार हे जगातलं एकमेव सरकार आहे जिथे जनता म्हणते कायद्याचे पालन झाले पाहिजे आणि सरकार म्हणते कायद्याचे पालन करणार नाही किमान या गोष्टीसाठी जागतिक  स्तरावर महाविकास आघाडी सरकारचा सत्कार व्हायला हवा. दुसरा प्रश्न विचारला जातो महागाई आणि पेट्रोल-डिझेल दरवाढ या विषयावर राजसाहेब का बोलत नाही, आमचा त्यांना प्रश्न आहे सगळ्यावर आम्हीच बोलायचं तर मग तुम्ही काय फक्त टेंडर मधील कमिशन खाणार? आणि तुमचे संसदेत निवडून गेलेले खासदार काय अंडी उबवणार?राज्यसरकारनी महागाई कमी करण्यासाठी काय उपाय योजना केल्या?मुळात ज्या राज्याचे मुख्यमंत्री दोन वर्षांनी मंत्रालयात गेले म्हणून हेडलाईन होते तिथून काय अपेक्षा ठेवणार? कोविडकाळात सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी बेदखल होतं, मुख्यमंत्री कुणाला भेटत नव्हते, तेव्हा प्रश्न मार्गी लागावे म्हणून लोक कृष्णकुंजवर यायचे. खरे सांगायचे तर मुख्यमंत्र्यांनी कोविडकाळाचं कारण पुढे करून लोकांची सहानुभूती मिळवण्याच प्रयत्न केला. आणखी एक आरोप म्हणजे राजसाहेब दुसऱ्या कुणाची तरी भाषा बोलतात त्याबद्दल एवढंच सांगीन की "राजसाहेब कुण्याच्या खांद्यावरून ना कधी बंदूक चालवत ना कुणाला स्वतःचा खांदा बंदूक चालवायला देतात. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एवढ्या कोलांट उड्या मारल्यात की मनसेबद्दल बोलायचा नैतिक अधिकार एकालाही नाही. राहता राहिला प्रश्न भाजप आणि मनसे युतीचा तर काळाच्या पोटात काय दडलंय हे कोणीही सांगू शकत नाही! 

(लेखक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत )

टॅग्स :MNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेRaj Thackerayराज ठाकरे