शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

राज ठाकरेंना त्रास देणारे घरातलेच आणि स्वकीय होते; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 11:03 IST

२०१९ पूर्वी नरेंद्र मोदींची केली तर २०१९ नंतर शरद पवारांची चमचेगिरी केली. त्यामुळे चमचेगिरी करण्याचं कौशल्य हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अशी टीका त्यांनी केली. 

मुंबई - आदित्य ठाकरेंवरील आरोपावर पाठराखण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले पण राज ठाकरेंवर टीका केली होती. आता मनसेनेउद्धव ठाकरेंवर पलटवार करत आता आदित्य ठाकरेंबाबत जी काही एसआयटी चौकशी लावली आहे ती विरोधकांनी लावलीय, परंतु राज ठाकरेंच्या वेळी त्यांना त्रास देणारे घरातलेच आणि स्वकीयच होते असा निशाणा साधला आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, गेल्या २५ वर्षापासून उद्धव ठाकरे सेटलमेंट करतायेत. टीका केली म्हणून झोंबण्याचे कारण काय? आम्ही जे आंदोलन केले त्याचा निकाल आला. मराठी पाट्या आंदोलन झाले, ज्या लोकांनी टोलनाके बंद करू असं आश्वासन दिले पण सत्तेत आल्यावर काय केले? ऑक्सिजनचा कुठलाही संबंध नसताना हायवे कंपनीला कंत्राट कसे मिळाले. बीएमसीमध्ये सत्तेत असताना रस्ते कंत्राटासाठी ६ कंपन्या सोडून सातवी कंपनी का आली नाही. मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा यांनी प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी चमचेगिरी करण्याची सवय आहे. २०१९ पूर्वी नरेंद्र मोदींची केली तर २०१९ नंतर शरद पवारांची चमचेगिरी केली. त्यामुळे चमचेगिरी करण्याचं कौशल्य हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अशी टीका त्यांनी केली. 

तसेच ज्यांच्या मानेला आणि मनाला पट्टा बांधलाय त्यांना शालीचे वजन आणि विचारही पेलणार नाहीत.त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल न बोललेलं बरे.आतापर्यंत या लोकांनी जी आंदोलन केली.याआधी रिलायन्सच्या इलेक्ट्रिक दरवाढीविरोधात आंदोलन केले त्याचे पुढे काय झाले? यूएलसीबद्दल आंदोलन केले त्यानंतर कुठल्या बिल्डरसोबत सेटलमेंट झाल्यावर आंदोलन मागे घेतले? नाणार प्रकल्पासाठी आंदोलन केले. मग बारसूला रिफायनरी प्रकल्प करावा यासाठी पत्र लिहणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणासोबत सेटलमेंट केली? ज्यावेळी अंबानी समुहाला सौदी अरेबिया कंपनीचे शेअर्स मिळाले त्यानंतर तुम्ही बारसूसाठी पत्र लिहिले.मग तेव्हा कुठली सेटलमेंट केली. त्यामुळे कोण कोणाचे चमचे आहेत हे जगाला माहिती आहे. अदानींच्या सांगण्यानेच आंदोलन करताय का असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, सामान्य माणसांच्या प्रश्नावर कुणी बोलताना दिसत नाही. कांदा निर्यात बंदीने शेतकऱ्यांचे हाल झालेत. अवकाळी पावसानं शेतीचे नुकसान झाले आहे. शहरात गेली २ वर्ष लोकप्रतिनिधी नाही. महापालिकेच्या तिजोरीचा पैसा सगळे अधिकारी लुटून खातायेत त्याकडे कुणी लक्ष देत नाही.  कोण कोणाच्या लग्नात गेले, कुणी कुठे डान्स केला यापेक्षा लोकांच्या प्रश्नावर लक्ष दिले पाहिजे असं मनसे नेते देशपांडे म्हणाले.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे