शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फ कायदा लागू झाल्यानंतर गावकऱ्यांना आली पहिली नोटीस; खाली करा नाहीतर कर द्या, तामिळनाडूत खळबळ
2
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: बुधवारी गणेश पूजनाला विशेष महत्त्व; पाहा, महात्म्य, मान्यता
3
द्वारका किती प्राचीन आहे? हे जाणून घेण्यासाठी, एएसआयने समुद्राखाली चालवली विशेष मोहीम
4
IPL 2025: MS Dhoni म्हणजे 'ब्रँड' ! उभं केलंय कोट्यवधींचं साम्राज्य; जाणून घ्या नेटवर्थ किती?
5
'या' लोकांना मिळणार नाही आयुष्मान कार्ड; तुमचे नाव तर यादीत नाही ना? असे तपासा ऑनलाईन
6
IPL 2025: CSKचा झेंडा घेऊन स्टेडियममध्ये जायचं नाही... लखनौमध्ये फॅन्सना आला विचित्र अनुभव (Video)
7
नितिश कावलियावर ३ वर्षांची निलंबनाची कारवाई; ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब
8
Mangal Neptune Yuti 2025: २० एप्रिल रोजी तयार होणारा नवपंचम राजयोग उघडणार 'या' तीन राशींचे भाग्य!
9
तीन वनडे, तितक्याच सामन्यांची टी-२० मालिका, टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक आलं
10
"राया करा एक इशारा, आलेच मी..!" सई ताम्हणकरची शानदार लावणी, 'देवमाणूस'मधलं गाणं रिलीज
11
पृथ्वीवरील एकमेव ठिकाण, जिथून दिसतं भविष्य, पण माणसांना जाण्यास आहे सक्त मनाई, कारण काय? 
12
मोठी बातमी! मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेले ७ निर्णय...
13
काठ्या, पाईप अन्...; घरात मित्राला पाहून पती भडकला, मशिदीत केली पत्नीची तक्रार; जमावानं दिली 'तालिबानी शिक्षा'
14
तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा विधानसभेत प्रस्ताव; CM एम.के स्टॅलिन यांची मोठी खेळी
15
ऐरोलीमधील टी भारत बिजली जंक्शन अंडरपास रस्ता दोन दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद!
16
कौतुकास्पद! विनोद कांबळीला मदत करण्यासाठी सुनील गावस्कर सरसावले; दरमहा देणार 'इतके' पैसे
17
'बीडपेक्षा सिंधुदुर्गात मोठी दहभत! नग्न करुन तरुणाची हत्या केली'; वैभव नाईकांचा गंभीर आरोप
18
लाडक्या बहिणींना आता फक्त ५०० रुपयेच मिळणार; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका, म्हणाले...
19
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: वर्षभर बाप्पा कृपा करेल; चंद्रोदयाला ‘हे’ कराच, पुण्य लाभेल
20
गुंतवणूकदारांकडे गोल्डन चान्स, 'या' ५ स्टॉक्सवर HSBC बुलिश; कोणते आहेत शेअर्स, काय आहे टार्गेट प्राईज?

“आमचा पक्ष राहावा की नाही हे आता भय्ये ठरवणार का?”; सुप्रीम कोर्टातील याचिकेवर मनसे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:13 IST

MNS Sandeep Deshpande News: मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल, अशी आक्रमक भूमिका मनसे नेत्यांनी घेतली आहे.

MNS Sandeep Deshpande News:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा. तसेच मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना या पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे आणि मनसेच्या विरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. RSS, बजरंग दलात ९० टक्के कार्यकर्ते हे उत्तर भारतीय आहेत याचा आम्हाला गर्व आहे. त्यांचे वडील, काका, मोठे भाऊ, आजोबा ड्युटीवर आहेत ते तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. त्यांच्या कानफाडीत तुम्ही मारताय. उद्या तुम्हाला या लोकांनी मदत केली पाहिजे हे कसले राजकारण. आम्ही तुमचा विरोध करतो, सर्वोच्च न्यायालयातून तुमच्याविरोधात आदेश आणणारच. सनातनी हिंदू पक्ष म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित करून तुमच्याविरोधात उभे करणार, असा इशारा सुनील शुक्ला यांनी दिला आहे. यानंतर आता संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे.

आमचा पक्ष राहावा की नाही हे आता भय्ये ठरवणार का?

कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे की, मनसेची मान्यता रद्द करावी. मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल, अशी पोस्ट संदीप देशपांडे यांनी एक्सवर केली आहे. तसेच मीडियाशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, आमचा पक्ष राहावा की राहू नये हे आता भय्ये ठरवणार का? त्या याचिकेमागील षड्‍यंत्र तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे षड्‍यंत्र  आहे. हे भाजपाचे षड्‍यंत्र आहे. हे लोक भाजपाचेच पिट्टू आहेत. भाजपावाले यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांना इथे ठेवायचे की नाही याचाही आम्हाला विचार करावा लागेल, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

दरम्यान, मराठी न बोलणाऱ्या इतर भाषिक लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर कारवाई करावी आणि मनसेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. ३० मार्च २०२५ रोजी राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केलेल्या भाषणाचा उल्लेखही या याचिकेत करण्यात आला आहे. मॉल आणि बँका अशा सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या अमराठी भाषिकांवर हल्ले केले जात आहेत, असेही या याचिकेत म्हटले गेले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि भारतीय निवडणूक आयोग यांच्याकडे अनेकदा लेखी तक्रारी करूनही एफआयआर दाखल करण्यात आलेले नाहीत, असेही याचिकेत म्हटले आहे.

 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय