शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जिथे जिथे उबाठा उमेदवार पडणार तिथे मनसे पेढे वाटणार; अविनाश जाधवांनी सांगितले रत्नागिरीतून स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 18:44 IST

Avinash Jadhav: किती वर्षे जुन्या आठवणीत जगायचे. त्यांनी आश्वासन दिली आहेत, जे काही गुन्हे दाखल झाले आहेत ते पाठी घेण्याचे आश्वासन मिळाले आहे, असे जाधव म्हणाले. 

मनसेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. आज नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये अर्ज भरला आहे. यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव उपस्थित होते. यावेळी जाधवांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपावी असे आमचे स्वप्न आहे. जिथे जिथे उबाठा उमेदवार पडणार तिथे तिथे मनसे पेढे वाटणार असल्याचे वक्तव्य केले आहे. 

राणे यांचा विजय निश्चित आहे. आमचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून राणेंसाठी काम करणार आहेत. ज्या काही गोष्टी झाल्या आहेत, त्या विसरून, पुढे जायचे आम्ही ठरवलेले आहे. किती वर्षे जुन्या आठवणीत जगायचे. त्यांनी आश्वासन दिली आहेत, जे काही गुन्हे दाखल झाले आहेत ते पाठी घेण्याचे आश्वासन मिळाले आहे, असे जाधव म्हणाले. 

महाराष्ट्र सैनिकांचा विचार करून राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला असेल. पक्ष आदेशावर जगणारी आम्ही माणसे आहोत. वैभव खेडेकर यांचे नाव आमदारकीसाठी का नाही येऊ शकत? असा सवाल करत आम्हाला सर्व कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद आहे.  खेड-दापोलीत काही लोकांचा मतप्रवाह वेगळा होता. रायगडमध्ये सुनील तटकरे यांचे काम वैभव खेडेकर करणार आहेत, असे जाधव यांनी स्पष्ट केले. 

भास्कर जाधव काय बडबडतात ते त्यांचे त्यांना तरी कळते का, तुमच्या नादाला आम्ही लागत नाही, त्यामुळे आमच्या वाटेला जाऊ नका, आमच्या नादाला लागू नका. तुमच्या बैठकांमध्ये येऊन तमाशा करू. संपलेल्या पक्षाचा हा पुढारी तुमच्या पक्षाची ही परिस्थिती का आली, हे भास्कर जाधव यांनी एकदा पहावे असा इशारा जाधव यांनी दिला. भास्कर जाधव यांच्या वक्तव्यानी मनसैनिक चिडलेला आहे, असेही जाधव म्हणाले. 

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४