शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

घोकंपट्टीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Published: June 16, 2017 12:23 AM

दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी १००पैकी १०० गुण मिळवल्याने राज्याच्या शिक्षणपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. ती योग्यच आहे. पण, नीट आणि जेईई परीक्षांचा निकाल

- लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी १००पैकी १०० गुण मिळवल्याने राज्याच्या शिक्षणपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. ती योग्यच आहे. पण, नीट आणि जेईई परीक्षांचा निकाल चांगला लागायला हवा असेल; तर सध्याचा घोकंपट्टीचा अभ्यासक्रम बदलणे अपेक्षित आहे. त्यासाठी दहावी व बारावीचा परीक्षा पॅटर्न बदलावा लागेल. तो बदलण्यापूर्वी अभ्यासक्रम बदलायला हवा. शिक्षणतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार तो २०१९मध्ये बदलला जाईल, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि राज्यात शाळेच्या पहिल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या प्रवेशोत्सवानिमित्त ते बोलत होते. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेत गुरुवारी आयोजित शैक्षणिक कार्यक्रमात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाददेखील साधला. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, महापौर राजेंद्र देवळेकर, शिक्षण सभापती वैजयंती घोलप, के.सी. गांधी विद्यालयाचे अध्यक्ष अशोक प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते. नीट आणि जेईईच्या परीक्षांबाबत सरकारने न्यायालयात आपली बाजू योग्य प्रकारे मांडली होती, असे सांगून तावडे म्हणाले, शैक्षणिक बदल हा विजेचे बटण दाबावे, तसा होत नाही. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी आधी नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलावा लागेल. ही प्रक्रिया २०१८मध्ये होईल. त्यानंतर, २०१९मध्ये दहावी व बारावीचा अभ्यासक्रम बदलता येईल.