शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

सीमेवर तणाव असताना मोदी प्रचारसभेत

By admin | Published: October 13, 2014 10:34 PM

आर. आर. पाटील : तासगाव येथे सभा, भाजप धोरण शेतीविरोधी

तासगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूने विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत असताना सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान शहीद होत आहेत. पंतप्रधान म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे का निवडणुका महत्त्वाच्या, असा सवाल माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तासगाव येथे उपस्थित केला. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.पाटील म्हणाले की, सत्तेवर आल्यावर महागाई कमी करणार म्हणणाऱ्या भाजप सरकारने महागाई वाढवली. शेतीमालाच्या दरात वाढ व्हायला लागल्यावर आयात-निर्यातीचे धोरण बदलले. शेतकऱ्यांच्या मालाचे दर गडगडले, तर उद्योगपतींच्या उत्पादनांचे दर वाढले. भाजपचे धोरण उद्योगपतींना पाठीशी घालणारे आहे. भाजपचे नेते विदर्भ वेगळा करू, असे सांगतात. राज्याचे तुकडे पाडायला निघालेल्यांच्या हाती राज्य द्यायचे का? तासगाव, कवठेमहांकाळमधील दुष्काळ हटविण्याचे काम केले आहे. पुढच्या पाच वर्षांत हे दोन्ही तालुके राज्यातले समृध्द तालुके केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या, भाजपने केवळ जाहिराती केल्या आहेत. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने आर. आर. पाटील यांचे मोठेपण टिकविण्याची गरज आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील, विजय सगरे, भारत डुबुले, अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, ताजुद्दीन तांबोळी, हायुम सावनूरकर, विश्वास माने यांची भाषणे झाली. सांगता सभेपूर्वी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तासगावातून सवाद्य रॅली काढली. (वार्ताहर)