शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

मोदी स्वस्त पंतप्रधान

By admin | Published: October 13, 2014 10:45 PM

नारायण राणेंची टीका : मालवणात प्रचाराची सांगता

मालवण : देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्याप्रमाणे वागत आहेत. देशाच्या आजवरच्या इतिहासात त्यांच्याइतका स्वस्त पंतप्रधान कुणीही पाहिला नसेल. देशाचा कारभार सोडून त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी २५ हून अधिक सभा घेतल्या. अगोदर खोटी स्वप्ने दाखवून देशाची सत्ता मिळविली. मोदी आता महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा मोदींचा डाव आहे. गुजरातचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी धडपडत आहेत. मोदींचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी संपली. या निमित्ताने काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख असलेल्या नारायण राणे यांनी सोमवारी सायंकाळी टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणात जाहीर सभा घेत काँग्रेसच्या प्रचाराचा समारोप केला.महाराष्ट्राच्या अस्मितेला हातनरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घातला आहे. केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी कारस्थाने सुरु केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता जागी झाली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. यामुळेच मुुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना रिझर्व्ह बँकेची कार्यालये दिल्लीला हलविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यांना ते जमले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या कासार्डे येथील सभेवरही राणे यांनी टीका केली. मोदींची अनेक भाषणे मी पाहिलीत. मात्र आजच्या भाषणाची दखल घ्यावी असे मला वाटत नाही असे राणे म्हणाले. मोदींच्या सभेला गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली येथून माणसे गोळा करण्यात आली होती. सगळी मिळून सभेला २५ हजार माणसे गोळा झाली होती. ती सुद्धा पैसे देऊन गर्दी जमविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)शिवसेनेवर टीकामुख्यमंत्री पदासाठी २५ वर्षांपासूनची युती सेना भाजपाने तोडल्याचे राणे म्हणाले. या दोघांमध्ये एकही व्यक्ती मुख्यमंत्री होण्याच्या लायक नाही. उद्धव ठाकरेंनी कधी विधानसभा पाहिली नाही. ते मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पहात आहेत. शिवसेनेच्या एकाही खासदारामध्ये साधे ५ मिनिटे मराठीतून भाषण करण्याचे धाडस नाही. विधानसभेला शिवसेनेने दिलेले उमेदवार वैभव नाईक नगरपालिकेमध्ये कधी दोन मिनिटे बोलू शकला नाही. २०० मिली तेल वाटून आमदार बनता येत नाही. त्यासाठी वैचारिक पातळी असावी लागते.