शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

पंतप्रधान मोदी मला मान्य नाहीत - श्रीपाल सबनीस

By admin | Published: January 01, 2016 4:24 PM

मन की बातमधून जनतेशी संवाद साधणारे मोदी संसदेत महत्वांच्या विषयावर मौन सोडत नाही, ते देशात बोलत नाहीत, पण परदेशात भाषणे देतात, ही त्यांची अंतर्गत भूमिका मला मान्य नाही, असे सबनीस म्हणाले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - गोध्रा हत्याकांडामुळे नरेंद्र मोदी कलंकित झाले मात्र तेच मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गौतम बुद्ध, महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान सांगत जगातील दहशतवाद कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. संघातून आलेल्या  मोदींचं स्वागत करायला पाकिस्तान किंवा इस्लाम राष्ट्रे वेडी नाहीत, असे सांगत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मात्र आपण पंतप्रधानांचे समर्थक आहोत, नरेंद्र मोदींचे नव्हे असे स्पष्ट करत रेडिओच्या 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणारे पण संसदेत मौन न सोडणारे, परदेशात भाषणं करणारे आणि देशातील माध्यमांसमोर काहीही न बोलणारे मोदी आपल्याला बिलकूल मान्य नाहीत, त्यांच्या या अंतर्गत भूमिकेवर मला आक्षेप आहे, असेही सबनीस म्हणाले. 
दहशतवाद्यांकडून धोका असतानाही शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकमध्ये गेले, त्यांना तेथे काही झाले असते तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी त्यांना श्रद्धांजली वहावी लागली असती, असे वक्तव्य पिंपरीतील कार्यक्रमादरम्यान केल्यामुळे चर्चेत आलेल्या सबनीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना  पुरस्कार वापसीपासून ते दुष्काळापर्यंत अनेक मुद्यावर आपली मतं परखडपणे मांडली. 
नरेंद्र मोदी ही एक व्यक्ती म्हणून मला मान्य नाही, पंतप्रधान म्हणूनही त्यांच्या अनेक भूमिकांना माझा विरोध आहे, पण त्याच भारताच्या पंतप्रधान मोदींच्या तोंडून परदेशात भारताचे बुद्ध, गांधी यांचा उल्लेखाने जगातील क्रौर्य, दहशतवाद दूर होत असेल, परदेशातील व्यक्ती त्यांचा स्वीकार करत असतील, तर मग आपण त्यांना विरोध का करायचा? आपले त्यांच्याशी मतभेद असू शकतात, त्यावरून आपण भांडूही शकतो, पण जर मोदींच्या तोंडून गांधी, बुद्ध येत असतील तर त्याचं  स्वागत केलं पाहिजे, अशी भूमिका सबनीस यांनी मांडली. 
देशातील वाढत्या असहिष्णूतेमुळे विविध साहित्यिक, लेखक आणि दिग्गजांनी केलेल्या पुरस्कार वापसीचेही सबनीस यांनी समर्थन केलं. कलबुर्गी यांची झालेली हत्या आणि बीफच्या मुद्यावरून दादरी येथे जमावाच्या मारहाणीत झालेल्या इखलाख या मुसलमानाचा मृत्यू, या दोन्ही अतिशय निंदनीय घटना आहेत, त्यामुळेच पुरस्कार वापसी झाली आणि मी त्या पुरस्कार वापसीचे समर्थन करतो, असं सबनीस म्हणाले. पुरस्कार वापसीचा निर्णय हा असा अचानक घेण्यात आला नव्हता. मात्र तो घेण्यापूर्वी त्यांनी सरकारशी संवाद साधून, आपल्या समस्या, आक्षेप सांगायला हवे होते. सरकारच्या असहिष्णुतेबद्दल भारताचीच जनता असलेल्या या दिग्गजांनी पुरस्कार परत केले ना? पण हे सरकारही त्यांचच आहे ना, मग निषेधाचा मार्ग म्हणून पुरस्कार वापसीसारखं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी संवाद का साधला नाही? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच या घटनेच्या निषेधार्थ आपणही पुरस्कार वापस केला असता, पण तत्पूर्वी सरकारशी संवाद साधलाच असता असे सांगत सबनीस यांनी सुसंवाद महत्वाचे असल्याचे आवर्जून नमूद केले. 
 
साहित्य संमेलन रिकाम टेकड्यांचा अड्डा हे वक्तव्य नेमाडेंनाच लखलाभ
साहित्य संमेलन रिकाम टेकड्यांचा अड्डा हे भालचंद्र नेमाडेंचे वक्तव्य मला बिलकूल पटत नाही, त्यांचे हे वक्तव्य त्यांनाच लखलाभ. वारीला दरवर्षी येणारे ८-१० लाख भाविक रिकामटेकडे नसतील तर मग त्यांच्याप्रमाणेच साहित्यावर श्रद्धा असणारे एकत्र येत असतील तर त्यांना रिकाम टेकडं का म्हणायच? अस विचारत मी किंवा संमेलानाला येणारी कोणतीच व्यक्ती रिकाम टेकडा नाही, असे स्पष्ट मत सबनीस यांनी मांडले. तसेच नेमाडे आमच्या मंचावर येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू असेही ते म्हणाले.