शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

मो.ह. शाळा वाचवण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2017 3:32 AM

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील मो.ह. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने अनोखे जनजागृती अभियान सुरू केले

ठाणे : मराठी शाळा सुरू राहावी आणि तेथील पटसंख्या वाढावी, यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील मो.ह. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने अनोखे जनजागृती अभियान सुरू केले आहे. यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांना वळवण्यासाठी जोगवा मागितला जात आहे. त्यात यश आल्याचे दिसत असून आतापर्यंत बालवर्गातील १५ जणांचा शाळा प्रवेश निश्चित झाला आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना टाकण्याचा सामान्यांपासून ते उच्चभ्रू अशा सर्वांचा क ल वाढला आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ही बाब लक्षात घेऊन ही शाळा वाचावी, यासाठी मो.ह. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक सरसावले आहेत. विशेष म्हणजे मिनी शिशू वर्गापासून ते इयत्ता चौथीपर्यंतच्या वर्गात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून विनाडोनेशन प्रवेश तसेच ८ एप्रिलपर्यंत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तूदेखील देण्यात येत आहे. त्यानुसार, आतापर्यंत तब्ब्ल १५ मुलांचे बालवर्गासाठी प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली ते चौथी प्रवेशासाठी आतापर्यंत ३० अर्ज पालक घेऊन गेले आहेत. तसेच मो.ह. विद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी आरटीई नियमाप्रमाणे प्रवेश घ्यावा, असे आवाहनदेखील प्राथमिक विभागाने केले आहे. बाहरेच्या गावांतून येणाऱ्या मुलांसाठी बससेवा सुरू करावी, असे पत्र ठामपा परिवहन सभापतींना पत्र देणार असल्याचे आणि त्यांना विनंती करणार असल्याची माहिती मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)>बसचा प्रश्न महत्त्वाचामाणकोली, अंजूरदिवे परिसरांतील मुले शाळेत येण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्यांना खासगी बसचा खर्च परवडणारा नाही.पालकवर्ग संभ्रमात पडल्याचे चित्र या वेळी शिक्षकांना निदर्शनास आले. तो प्रश्नही सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले.