शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

"भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात"; संजय राऊत काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:32 IST

Sanjay Raut Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संभल मुद्द्यावर भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. 

"राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे योग्य नाहीये", असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे संभलमधील वादावर भाष्य केले होते. सरसंघचालकांच्या भूमिकेबद्दल शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आले. या लोकांना मोहन भागवत यांनीच सत्तेवर बसवले आहे, अशी टीका राऊत यांनी केली.  

मुंबईत माध्यमांशी खासदार राऊत यांनी संवाद साधला. 'हे जे मंदिर मशीद सुरू आहे, ते थांबवलं पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले आहेत', याबद्दल संजय राऊतांना विचारण्यात आले. 

'राम मंदिर आंदोलनात फक्त भाजप आणि मोदीजींचेच योगदान नव्हते'

खासदार राऊत म्हणाले, "राम मंदिर हे एक आंदोलन राहिले आहे, या देशाचे. या आंदोलनात आणि राम मंदिराच्या निर्माणात सगळ्यांचेच योगदान आहे. फक्त भाजप आणि मोदीजींचेच योगदान नव्हते. मोदी तिथे कुठेच नव्हते."

राम मंदिर आंदोलनात काँग्रेसचे लोकही होते -राऊत

"त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. भाजपचे लोकही सामील होते, नव्हते असे नाही. अडवाणीजी होते. शिवसेना होती, बजरंग दल होता. विश्व हिंदू परिषद होती. इतकंच नाही, तर काँग्रेस पक्षाचे लोकही त्यात सहभागी होते. मी बघितले आहे. जर केंद्रात नृसिंहराव यांच्यासारखा नेता केंद्रात नसता किंवा डॉ. शंकर दयाळ शर्मा नसते, तर मंदिर झालेच नसते. आज मंदिर झालेच नसते", असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.  

रामाला मोदींनी आणले. मंदिर मोदींनी बनवले, हे खूप दुर्दैवी आहे. ही गोष्ट खरी आहे की, मंदिर बनवल्यामुळे कोणी नेता होत नाही. देश एक मंदिर आहे. देशाला बनवा. निवडणूक आली, तर मशीद खोदा, इथे खोदा, तिथे खोदा. इथे मंदिर आहे, तिथे मंदिर आहे, हे जे नाटक सुरू आहे ना, हा देशासाठी खूप मोठा धोका आहे." 

"मी सरसंघचालकांच्या विधानाशी मी सहमत आहे. पूर्ण देश सहमत आहे, पण आमचं हेही म्हणणं आहे की, भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात. तर तुम्ही सुद्धा जबाबदारी घ्या", असे संजय राऊत म्हणाले.   

 मोहन भागवत यांचे विधान काय?

"अयोध्येत राम मंदिर व्हावं असं हिंदुंना वाटायचं, त्याप्रमामे राम मंदिर पूर्णही झाले आहे. मात्र, राम मंदिरासारखं आंदोलन पुन्हा करून नेता होता येत नाही. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे योग्य नाहीये", असे म्हणत मोहन भागवत यांनी संभलमधील वादाच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिरBJPभाजपाcongressकाँग्रेस