शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दानवे यांचा राजकीय प्रवास सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 03:35 IST

२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदींच्या पहिल्या मंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु नंतर पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवली

जालना : सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंतचा खा. रावसाहेब दानवे यांचा प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर आता दुसऱ्यांदा त्यांना केंद्रात राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून ते जबाबदारी सांभाळणार आहेत.

जालना जिल्ह्यातील जवखेडा (ता. भोकरदन) येथे शेतकरी कुंटुंबात दानवेंचा जन्म झाला. वयाच्या २०व्या वर्षीच ते गावाच्या राजकारणात उतरले. प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि भोकरदन पंचायत समितीचे सभापती झाले. नंतर १९८५ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु पहिल्यांदाच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. १९९० मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांना पहिल्यांदा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. नंतर युतीच्या काळातही ते आमदार होते. पंचायतराज समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. दानवे पाचव्यांदा लोकसभेत गेले आहेत.

२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदींच्या पहिल्या मंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु नंतर पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवली. त्यात त्यांनी राज्यातील जिल्हा परिषदा, महानगर पालिका तसेच विधासभा, विधान परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये चौफेर यश मिळवून भाजपला राज्यात क्रमांक एकचा राजकीय पक्ष म्हणून नावारूपास आणले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधी