शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

मोरबे धरणग्रस्त अजूनही नागरी सुविधांपासून वंचित

By admin | Published: April 26, 2016 3:17 AM

खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे. येथील सात आदिवासी वाड्यातील नागरिक गेली १५ वर्षे संघर्ष करूनही नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहेत

आविष्कार देसाई,

अलिबाग- खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे. येथील सात आदिवासी वाड्यातील नागरिक गेली १५ वर्षे संघर्ष करूनही नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहेत. आदिवासी समाजाला मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक वास्तव समोर असतानाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बेफिकिरी अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे.तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी येथे धरणाची उभारणी करण्याचे ठरले. सुमारे १९९४ साली धरण बांधण्यात आले. खालापूर तालुक्यातील चौक येथील पारकर बोरगाव, बौध्दवाडी, पिटकर वाडी, उंबरणे वाडी, अरकस वाडी, बोरगाव, नानीवली, नमऱ्याची वाडी, नढाळ वाडी, ओरशे कातकरवाडी, मोरबे कातकरवाडी, नढाळ नवीन, पडीर, कोयेने गाव या गाव वाड्यातील नागरिकांच्या जमिनी या धरणामध्ये गेल्या. त्यावेळी त्यांना तीन ते पाच हजार रुपये एकरी या दराने जमिनी विकाव्या लागल्या होत्या. जमिनी घेताना पुनर्वसन करण्याचे आश्वासन प्रशासन आणि सरकारने दिले होते. १५ वर्षे उलटून गेली तरी, वाड्या-वस्त्यांवर वीज पोचलेली नाही, रस्ते शोधूनही सापडणार नाहीत, गावठाण नाही, मैदान नाही, जागेची मोजणी झालेली नाही. स्मशानभूमीचाही मुद्दा आहे. अलिकडेच संघर्ष करून पाणी मिळाले आहे. प्रशासनही ठोस निर्णय घेत नसल्याचे मोरबे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.