शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

महाराष्ट्रातील 18 शहरांत अधिक प्रदूषण; चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 6:39 AM

औरंगाबाद, जालना, लातूरचाही समावेश

- विकास झाडेनवी दिल्ली : हवेतील शुद्धता कायम राखण्यासाठी पर्यावरण विभागाच्या वतीने काही मापदंड ठरवून दिले आहेत. मात्र, या मापदंडाला केराची टोपली दाखविणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली राजधानी प्रथम क्रमांकावर आहे. दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर आहे, तर महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुण्याचा नंबर लागतो.केंद्र सरकारने देशातील १२४ शहरांची नावे संसदेत जाहीर केली. या शहरांनी प्रदूषणाच्या सीमा ओलांडल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले की, हवेची गुणवत्ता विविध घटकांवर आधारित असते. त्या घटकांचा एकत्रित अभ्यास करून ठरावीक शहराचा प्रदूषणाचा स्तर ठरविणे अवघड आहे. त्यामुळे हवेची शुद्धता राखण्यासाठी काही मापदंड ठरविण्यात आले आहेत.या यादीनुसार दिल्लीतील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सरासरी १८१ इतके आहे तर भोपाळमधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १७२, अमृतसरमधील प्रदूषणाचा स्तर १६६, जालंधरमधील प्रदूषणाचा स्तर १६५ आणि लुधियानामधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १६१ इतका आहे. या यादीमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरे असलेल्या राज्यांत महाराष्ट्राचा पहिला नंबर येतो. देशात सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये १६, पश्चिम बंगालमध्ये ७, उत्तराखंड ३, मध्य प्रदेश ६, पंजाब ९, गुजरात ३, आंध्र प्रदेशातील १३ शहरांचा प्रदूषित शहरांमध्ये समावेश होतो. केंद्रीय पर्यावरण विभागाने हवेतील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी १ एप्रिल २०२० पासून इंधने आणि वाहनांना बीएस ४ आणि बीएस ६ अशी मानांकने लागू करण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोच्या उभारणीवर जास्त भर दिला जात आहे. स्वयंपाकासाठी हवा दूषित करणाऱ्या उपकरणांऐवजी सिलिंडर वापरण्यावर भर दिला जात आहे. आदी उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती दिली. देशात सर्वात प्रदूषित शहर दिल्ली देशात प्रदूषणात दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, उत्तराखंडने घेरलेल्या दिल्लीला सर्वाधिक प्रदूषणाचा फटका बसतो. नाेव्हेंबर ते मार्चपर्यंत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी ५०० ते १००० पर्यंत असते.हरयाणा आणि पंजाब येथे तण जाळण्याचे दुष्परिणाम दिल्लीला भोगावे लागतात. केंद्र सरकार आणि दिल्लीसह हरयाणा, पंजाब व उत्तर प्रदेश राज्य अद्यापही यावर तोडगा काढू शकले नाही.मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूरही प्रदूषित महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुणे सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. राज्यातील १८ शहरे प्रदूषित आहेत. त्यात चंद्रपूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर या शहरांचा समावेश आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण