शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

संशोधनक्षेत्रत अधिक कार्य व्हावे

By admin | Published: August 09, 2014 2:49 AM

काळाची गरज पाहता संशोधनक्षेत्रत अधिक कार्य झाले पाहिजे. असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केले.

मुंबई : काळाची गरज पाहता संशोधनक्षेत्रत अधिक कार्य झाले पाहिजे. विद्याथ्र्याना अधिकाधिक संशोधन करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केले. गुरुतेगबहादूरनगर येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कलाम उपस्थित होते.
याप्रसंगी माजी राष्ट्रपती कलाम यांनी विद्याथ्र्याशी संवाद साधला. तुम्हीच देशाचे भविष्य आहात, असे सांगून त्यांच्याकडून भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याची शपथ त्यांनी घेतली. तसेच विद्याथ्र्याचा उत्साह वाढवण्यासाठी ‘विंग्ज ऑफ फ्लाय’ ही कविता त्यांनी वदवून घेतली. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, शिक्षणाच्या जोरावरच यशाचे शिखर गाठू शकता. याचबरोबर टीव्ही कमी पाहण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. टीव्ही पाहण्याचा वेळ कमी करून त्याऐवजी गुरुगं्रथ यांसारखे धार्मिक ग्रंथ वाचून ज्ञानात भर घालावी, असा उपदेशही त्यांनी दिला.
कलाम यांनी शिक्षकांना सांगितले, जे ज्ञान आपण विद्याथ्र्याना देतो ते स्वत:ही आत्मसात करावे. तसेच विद्याथ्र्यासमोर उभे राहून शिकवताना कोणतीही चूक होऊ देऊ नका. आजची पिढी ही फार हुशार आहे. त्यामुळे तुमची चूक लगेच पकडली जाते. कलाम यांनी विद्याथ्र्याकडून ‘मी करू शकतो, आपण करू शकतो, भारत करू शकेल’ असा नाराही वदवून घेतला.
समारंभाच्या अखेरीस त्यांनी विद्याथ्र्याकडून दहा शपथा ग्रहण करून घेतल्या. यात घरापासून संपूर्ण समाज भ्रष्टाचारमुक्त करणो, यंत्रणा पारदर्शक बनवणो, चांगला नागरिक बनणो, जीवनात मोठे लक्ष्य करून त्यासाठी जगणो यांचा समावेश होता. एका विद्याथ्र्याने कलाम यांना शैक्षणिक क्षेत्रत आरक्षणाची गरज काय, असा प्रश्न केला. त्यावर कलाम म्हणाले, काही काळापूर्वी या आरक्षणाची गरज भासत होती. मात्र, आता जसे अभियांत्रिकी शाखेत जागा मोकळ्या राहत आहेत, त्याचप्रमाणो पुढील काळात वैद्यकीय आणि व्यवस्थापकीय क्षेत्रतसुद्धा ही परिस्थिती उद्भवणार आहे.
कार्यक्रमात रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ. एम.एम शर्मा तसेच गुरुनानक विद्यक सोसायटीचे संचालक समितीचे अध्यक्ष सरदार मनजीतसिंग भट्टी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभोळकर या वेळी उपस्थित होते. गुरुनानक महाविद्यालयाच्या नावाच्या पोस्टल कार्डचे डॉ. कलाम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)