शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

मातृभाषेतून शिक्षण ही जगभरात सुरू असलेली चळवळ - विनोद तावडे

By admin | Published: February 20, 2016 12:51 PM

मातृभाषेतून शिक्षण ही सध्या जगभरात सुरू असलेली चलवळ असल्याचे सांगताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - मातृभाषेतून शिक्षण ही सध्या जगभरात सुरू असलेली चलवळ असल्याचे सांगताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला. लोकमत माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘शिक्षण संवाद’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. आज शनिवारी सकाळी ११ वाजता पुण्यातील हॉटेल वेस्टइनमध्ये हे चर्चासत्र झाले. शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संस्थापकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून राज्याचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी यावेळी निर्माण करण्यात आली. या कार्यक्रमात व्यक्त झालेले मान्यवरांचे महत्त्वाचे विचार पुढीलप्रमाणे:
 
- दहावीत कुणीही नापास होणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. तरीही नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आणि या मुलांना एक वर्षाचे कौशल्याधारीत शिक्षण देणार. हे एका वर्षाचे शिक्षण झाले की त्याला दहावी उत्तीर्ण असं प्रमाणपत्र मिळेल. - विनोद तावडे
- स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा तसेच शिक्षण कृतीशील असावे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. - विनोद तावडे
- सर्वसमावेशक शिक्षणप्रणालीला सीबीएसई किंवा आयसीएसई मंडळं ही अडथळे आहेत असं मला वाटत नाही. - तावडे
- प्रत्येक बालकामध्ये जिज्ञासू वृत्ती असते, त्यामुळे त्याला घोकंमपट्टी करायला न लावता ज्ञान देण्याची गरज आहे. - माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा.
- ज्यावेळी विद्यार्थी शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडेल त्यावेळी आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन व्यावहारिक असायला हवा - राजेंद्र दर्डा
- मध्ये पगाराव्यतिरिक्त 313 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. - राजेंद्र दर्डा यांनी दिली माहिती.
- ग्रामीण व शहरी भागात शिक्षणाचे अनेक प्रश्न असून त्यावर काम करण्याची गरज आहे तसेच सर्वाना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. - राजेंद्र दर्डा.
 
- विद्यापीठं व सरकार यांच्यामध्ये चांगला समन्वय असावा यासाठी शीर्षक संस्था असावी अशी सूचना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू पंडीत विद्यासागर यांनी केली.
- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शालेमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग असावेत अशी सूचना एका तज्ज्ञाने व्यक्त केली.
- औद्योगिक क्षेत्राची मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार शैक्षणिक क्षेत्राची मांडणी व्हायला हवी अशी अपेक्षा अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी व्यक्त केली.
- शैक्षणिक अभ्यासक्रम व शैक्षणिक धोरण आखताना FDI व Make In India यांनाही डोळ्यासमोर ठेवावं - डॉ. एकनाथ खेडकर
- लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा आणि समूह संपादक दिनकर रायकर मान्यवरांसह व्यासपीठावर असून तज्ज्ञांचे विचार ऐकण्यास निमंत्रितांची उपस्थिती.
- सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री. मालदार यांनी दर्जेदार शिक्षणावर भर दिला.
- तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पठाण यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याची अपेक्षा व्यक्त केली.