शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

...म्हणून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना लिहिलं खास पत्र, केलं अभिनंदन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 19:45 IST

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली आहे.

 मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाला समर्थन दिल्याबद्दल उत्तर मुंबईचे भाजप (BJP) खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे खास पत्र लिहून अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि हितासाठी नाणार प्रकल्पासंदर्भात आपण मांडलेली भूमिका रास्त आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. (MP Gopal Shetty congratulated Raj Thackeray for supporting the Nanar project in Ratnagiri )...अन् उद्धव ठाकरेंना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला; नाणार विरोधकांचा राज ठाकरेंवर आरोप

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली. यावेळी, रत्नागिरी राजापूरची रिफायनरी  चालू करून नाणार प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राबद्धलही शेट्टी यांनी राज ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

कोरोना काळात देशत अनेकांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे. त्यात अमर्याद स्वयंरोजगाराच्या संधी देणारा हा प्रकल्प सुरू करण्यात आला, तर नवीन पिढीसाठी रोजगार निर्मितीची मोठी पार्श्वभूमी तयार होणार आहे. असेही शेट्टी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

राज ठाकरेंची 'मन की बात' मुख्यमंत्री ऐकणार? मनसेप्रमुखांनी थेट शरद पवारांना फोन केला अन्...

याच बरोबर, 3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा नाणार प्रकल्प नाकारणे योग्य ठरणार नाही. यासंदर्भातील वाद सुरुवातीपासूनच चिघळलेला आहे. पण 2000 कोंकणवासियांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात, या प्रकल्पात स्थानिक कोंकणी माणसांच्या रोजगारला प्राधान्य देण्याची तजवीज केली आहे. उद्योग निर्मितीची मोठी संधी प्रामुख्याने कोकणातील तरुणांना दिली तर एकूण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हे हिताचे ठरेल, असे मतही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. एकेकाळी संगणक आले की बेरोजगारी वाढत जाईल, अशी भीती बाळगली जात होती. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे संगणका मार्फत "डिजिटल इंडिया"मुळे जागतिक पातळीवर पोहचले, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याच बरोबर मारुती सुझुकीला एकेकाळी विरोध झाला आणि नंतर त्या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली, याकडेही खासदार शेट्टी यांनी राज ठाकरेंचे लक्ष वेधले.

राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोनाची लस; शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती

एखादा मोठा प्रकल्प किंवा बदल घडणार असेल तर त्याला विरोध होणे, हे साहजिकच आले. पण नाणार प्रकल्पामुळे कोंकणबरोबरच देशात बदल घडत असेल तर या प्रकल्पाचा तज्ञ व्यक्तींच्या मदतीने फेरविचार करावा लागेल. मात्र, फक्त संघर्षामुळे विकासाच्या वाटा बंद होऊन तमाम जनतेचे हित लांबवले जात आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGopal Shettyगोपाळ शेट्टीBJPभाजपाMNSमनसे