शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 12:32 PM

पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदाराला घरातून अटक केली. त्यांची चूक काय होती? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी विचारला.

अमरावती - उद्धव ठाकरे, तुमचा घमंड, गर्व देवानेच ठेचला. तुम किस खेत की मुली हो?..५६ वर्ष ज्या घराण्यात तुम्ही जन्माला आला ते घर टिकवू शकले नाही. विचारधारा टिकवू शकले नाहीत. आमदार सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारेसाठी बाळासाहेबांनी जीवाचं रान केले. रक्ताचं पाणी केले, ते टिकवू शकले नाहीत. महाराष्ट्र काय बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यातही अश्रू असतील. त्यांची विचारधारा बुडवण्याचं काम मुलानेच केले अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त राणा दाम्पत्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. 

लॉकअपमध्ये कशी घालवली रात्र? स्टेजवर नवनीत राणांना अश्रू अनावर, काय घडलं?

खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, आज हनुमान चालीसा म्हटली म्हणून कुणी आपल्याला लॉकअपमध्ये टाकणार नाही. हनुमान चालीसा पठण केले म्हणून देशद्रोह खटला भरणार नाही. देशाच्या विरोधात काम करतोय असं कुणी म्हणणार नाही. ज्या भूमीत आपण सगळेच जन्मालो ती देवभूमी म्हणजे हिंदुस्तान, दगडातही देव शोधतो, आपली भक्ती-आस्था जोडली आहे. मातीच्या घरात राहत असो वा महलात राहत असला तरी देवाला मानतात. परंतु ज्या राज्याला संताची भूमी म्हणून ओळखले जाते याच महाराष्ट्रात ३३ महिन्याच्या सरकारने हनुमान चालीसा पठण केले म्हणून जेलमध्ये टाकले. आम्हाला हनुमान चालीसा म्हणण्याचा अधिकार नव्हता का? मुंबईत पाय ठेवला तर तुम्हाला गाडून टाकू अशी भाषा वापरली गेली तेव्हा महिला म्हणून मला काय वाटले असेल? असं त्यांनी सांगितले. 

तसेच अमरावतीने मला लढायला शिकवले, विदर्भाची सून म्हणून मी मुंबईत दाखल झाली. पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदाराला घरातून अटक केली. त्यांची चूक काय होती? हनुमान चालीसा पठण करा आम्ही धमकी नव्हती तर विनंती केली होती. २५-३० पोलीस घरात घुसले. आम्ही महाराष्ट्राला डाग लावून देणार नाही असं आम्ही सांगितले तरीही बळजबरीने आम्हाला वाहनात बसवून पोलीस स्टेशनला नेले तेव्हा काय वाटले असेल? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला. 

दरम्यान, पोलिसांना उद्धव ठाकरेंनी आदेश दिले. कोणत्या गुन्ह्याखाली आम्हाला अटक केली? हे आम्ही  विचारले. ते म्हणाले, मॅडम, मला काय विचारू नका, आम्हाला आदेश आहे. ज्या बाळासाहेबांनी रक्त आटवून राज्यातील प्रत्येक नागरिकांमध्ये हिंदू विचारधारा दिली. लढणे कशाला म्हणतात ते त्यांनी शिकवले. मात्र त्यांच्या सुपुत्राने ५६ वर्षाच्या मेहनतीला, विचारधारेची माती करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHanuman Jayantiहनुमान जयंती