शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आंघोळ करणे वाटते शिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2016 11:45 PM

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतील-मुंबई (आयआयटी-बी) दर दहा विद्यार्थ्यांपैकी सहा जण दोन किंवा तीन दिवसांतून एकदाच आंघोळ करतात

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1-  इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतील-मुंबई (आयआयटी-बी) दर दहा विद्यार्थ्यांपैकी सहा जण दोन किंवा तीन दिवसांतून एकदाच आंघोळ करतात. कारण तो त्यांना जाच वाटतो. दहा टक्के विद्यार्थी आठवड्यातून एकदाच तर ३० टक्के विद्यार्थी मात्र रोज आंघोळ करतात. आयआयटी-मुंबईतील वरिष्ठ विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहणीच्या दुसऱ्या टप्प्यातील हे निष्कर्ष आहेत.

या पाहणीतील प्रश्नांना शिकत असलेल्या, दोन पदव्या प्राप्त केलेल्या, एमएस्सी आणि एम टेक पदवीप्राप्त केलेल्या ३३२ विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली होती. पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृहातील जगण्याची नशा (हँगओव्हर) पुढेही काही काळ टिकून राहते. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत राहण्याचे ठरविले होते. २७ टक्क्यांनी घरी जायला पसंती दिली आणि एकट्याने राहण्याचा निर्णय १९ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला होता. दुसरीकडे ६६ टक्के विद्यार्थ्यांनी आपापल्या गावी नातेवाईकांशी घनिष्ट संबंध व संपर्क ठेवला होता तर २९.८ टक्के विद्यार्थ्यांनी पालकांशी सरासरीपेक्षाही कमी संबंध ठेवला होता. प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे खास स्वप्न असते ते म्हणजे मित्रांसोबत रस्त्याने गोव्याला जायचे. मुंबईत असे स्वप्न ५२.४ टक्के विद्यार्थ्यांनी साकारले होते.

७० टक्के विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेनने विनातिकीट प्रवास केला होता तर जेम्स बाँडच्या ‘कॅसिनो रोयाल’ या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन पोकर किंवा ब्लॅकजॅक खेळाचा आनंद ५५.७ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला होता. लग्न करण्यावर ३९.१५ टक्के विद्यार्थ्यांना पाच वर्षे तरी आपणच आपल्यासाठी खड्डा न खोदण्यास पसंती दिली होती. ३१ टक्क्यांनी या विषयावर काहीच सांगितले नाही तर २१.४ टक्के विद्यार्थ्यांनी तीन ते पाच वर्षांत लग्न करायचे सांगितले होते. धार्मिक श्रद्धेच्या प्रश्नावर ३९ टक्के विद्यार्थी आम्ही श्रद्धावान असल्याचे तर आम्ही नास्तिक असल्याचे २१ टक्क्यांनी व ३९ टक्क्यांनी आम्ही अज्ञेयवादी (ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान आपणाला नाही असे मानणारा-अग्नॉस्टिक) असल्याचे सांगितले होते.