शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

ठाकरे सरकार पुन्हा लॉकडाऊनच्या विचारात?; मुंबईच्या महापौरांनी दिले महत्त्वाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 15:08 IST

mumbai mayor hints lockdown in maharashtra: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिल्यास सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई: मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. या दोन आठवड्यात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशाच प्रकारे वाढत राहिल्यास राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं पेडणेकर म्हणाल्या. (mumbai mayor kishori pednekar hints about lockdown)Exclusive: पुणेकरांना सर्वात आधी द्या कोरोना लस; मोदी सरकार घेणार का 'त्या' पत्राची दखल?गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर अतिशय सूचक भाष्य केलं. 'गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्णांचं प्रमाण अशाच प्रकारे वाढत राहिल्यास महापालिकेला कठोर निर्णय घ्यावे लागतील,' असं पेडणेकर म्हणाल्या. कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ होत असून मृत्यूचं प्रमाणदेखील दिसू लागल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं.कोरोना रुग्ण वाढत असल्याने कठोर निर्णय घ्यावे लागतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेतमुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली. तेव्हापासून कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. लोक स्वत:ची काळजी घेत नसतील तर लॉकडाऊन करण्याची वेळ येईल. तशी चिंता राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. प्रत्येकानं स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना जपायला हवं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक काळजी घ्यायला हवी. तरच आपण कोरोनाची दुसरी लाट थोपवू शकू, असं पेडणेकर म्हणाल्या. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिल्यास मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे लॉकडाऊनचे संकेत दिले.मुंबईतील लोकलबाबत २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार? गेल्या दोन आठवड्यांत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

थोड्याच वेळात मुख्यमंत्री घेणार राज्यातील स्थितीचा आढावाकोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडून जिल्ह्यांमधील परिस्थिती जाणून घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेKishori Pednekarकिशोरी पेडणेकर