शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

मुंबईसह उपनगरात जोर‘धार’

By admin | Published: July 15, 2017 5:32 AM

मान्सून सक्रिय झाल्यानंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी आपला जोर कायम ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मान्सून सक्रिय झाल्यानंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी आपला जोर कायम ठेवला. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार पावसादरम्यान कुठेही पाणी साचले नसले तरीदेखील पडझड कायम होती. सलग सुरू राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळीच कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, परळ, माहीम, दादर आणि सायन परिसरात तर पूर्व उपनगरात भांडुप, मुलुंडसह घाटकोपर आणि कुर्ला येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, पार्ले आणि गोरेगाव येथेही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. विशेषत: वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात पावसाचा अधिक जोर असल्याचे चित्र होते. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी बरसलेल्या पावसाने दुपारी काही काळ विश्रांती घेतली. मात्र पुन्हा सायंकाळसह रात्री जोर पकडलेल्या मान्सूनधारांनी मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.दरम्यान, कुर्ला पश्चिमेकडील सफेद पूल येथे घराची भिंत पडून सहा जण जखमी झाले. यापैकी पाच जणांना पॅरामाउंट या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ३० ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम राहील. पुढील ४८ तास मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. >रायगड जिल्ह्यात संततधाररायगड जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद पेण येथे २४० मि.मी. झाली आहे. उर्वरित ठिकाणी कर्जत २३६.२० मि.मी., सुधागड १५५.३३, खालापूर १४४, पनवेल ८९.२०, माणगाव ९६, पोलादपूर ७८, रोहा ७३, महाड ७२, अलिबाग ३८, मुरुड २९, उरण ४४, तळा ४२, म्हसळा १५.४०, श्रीवर्धन १४ आणि गिरिस्थान माथेरान येथे १९९.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.>मोडकसागर धरणामुळे पालघरच्या ४२ गावांना धोक्याचा इशाराठाणे : जिल्ह्यातील मोडकसागर या धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, खर्डी नदी परिसरात असलेल्या गावांना धोक्याचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीवर मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. अवघ्या १८ तासांत या धरणाची पातळी झपाट्याने वाढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत काढलेल्या इशारापत्रकात धरणाखालील पालघर जिल्ह्यातील ४२ गावांना हा धोक्याचा इशारा देऊन सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात २४७.४० मिमी पाऊस झाला आहे. यामुळे रुंदे येथील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने १० ते १२ गावांचा टिटवाळा शहराशी थेट संपर्क तुटला.>पावसाची नोंदमागील २४ तासांत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३०.८, २६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात २०.७५, पूर्व उपनगरांत ३५.०२ आणि पश्चिम उपनगरांत २२.१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.