शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

मुंबईच्या विकासाची चर्चा दोन दिवसांत आटोपणार

By admin | Published: July 14, 2017 2:25 AM

तीन वर्षांचा लेटमार्क लागूनही २०१४ ते २०३४ या २० वर्षांतील मुंबईच्या विकासाचा आराखडा चर्चेच्या गदारोळात अडकला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तीन वर्षांचा लेटमार्क लागूनही २०१४ ते २०३४ या २० वर्षांतील मुंबईच्या विकासाचा आराखडा चर्चेच्या गदारोळात अडकला आहे. या आराखड्याचा पहिला मसुदा वादग्रस्त ठरल्यानंतर सुधारित आराखडा तयार झाला. मात्र, आरे कॉलनीचे द्वार विकासासाठी खुले करणे, काही जागांवरील आरक्षण, असे वाद कायम आहेत. त्यामुळे या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी नगरसेवकांनी तीन वेळा मुदतवाढ मागून घेतली. मात्र, ही मुदतही संपत असल्याने अवघ्या दोन दिवसांत (१४, १५ जुलै) पालिका महासभेत चर्चा आटोपण्यात येणार आहे. मुंबईचा सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांच्या कालावधीसाठीचा विकास आराखडा पालिकेने तयार केला. या आराखड्यावर ५० हजारांहून अधिक सूचना व हरकती आल्या होत्या. यामुळे भाजपा नेत्यांच्या मागणीनुसार आराखड्याचा मसुदा मुख्यमंत्र्यांनी रद्द करीत नव्याने आराखडा बनवण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने सुधारित आराखडा सादर केला. मात्र, पाच हजारांहून अधिक हरकती आल्यानंतर आराखड्याचा सुधारित मसुदाही वादात सापडला. त्यामुळे हा आराखडा समजून घेण्यासाठी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांनी तीन वेळा आराखड्याला मुदतवाढ मागून घेतली. मात्र, १८ जुलैपूर्वी हा आराखडा मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविणे आवश्यक आहे. त्यामुळे अवघे चार दिवस पालिकेकडे चर्चेसाठी शिल्लक आहेत. त्यामुळे १४ व १५ जुलै रोजी बोलाविलेल्या महासभेत आपल्या सूचना मांडून या आराखड्याला मंजुरी देण्यात येणार आहे.राज्य सरकारकडून आराखड्यात आवश्यक ते फेरबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आराखड्याला अंतिम मंजुरी देतील. या मंजुरीनंतर आराखड्याला अंमलबजावणीची जबाबदारी पालिका आयुक्त यांच्यावर असणार आहे. १९९१च्या विकास आराखड्यातील आरक्षणे आहे तशीच २०३४ च्या विकास आराखड्यात दर्शविली आहेत. त्या आरक्षित जागा पालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. ही आरक्षणे विकसित करण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात २०९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास आराखडा येत्या १८ जुलैपर्यंत पालिका सभागृहात मंजूर करून नगरविकास खात्याकडे पाठविणे बंधनकारक आहे. त्यामुळे कमी वेळेत घाईघाईने आराखडा मंजूर होण्याची शक्यता आहे.