शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

मुंबईचा ‘डीपी’ पुन्हा लांबणीवर

By admin | Published: May 09, 2017 2:37 AM

मुंबईच्या सुधारित विकास आराखड्याचे वाचन अद्याप अनेक नगरसेवकांनी केलेले नसल्याने या आराखड्याच्या मसुद्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या सुधारित विकास आराखड्याचे वाचन अद्याप अनेक नगरसेवकांनी केलेले नसल्याने या आराखड्याच्या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या महासभेत घेण्यात आला. आतापर्यंत तीनवेळा ही मुदत वाढवून देण्यात आल्याने विकास आराखडा लांबणीवर पडत चालला आहे. मुदतवाढ मंजूर झाल्यामुळे आता १९ जुलैपर्यंत या आराखड्याची मंजुरी लांबणीवर पडली आहे.मुंबईच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रस्तावित असलेला सन २०१४-२०३४ या २० वर्षांचा विकास आराखडा गेली दोन वर्षे रखडला आहे. या आराखड्याच्या मसुद्यामधील अनेक शिफारशींवर सर्वच स्तरांतून तीव्र पडसाद उमटले. यामध्ये परवडणारी घरे, आरे कॉलनीतील ना विकास क्षेत्र खुले करणे, कोळीवाडे व गावठाणांची दखल न घेणे अशा काही वादग्रस्त मुद्द्यांचा समावेश होता. या मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर सुधारित मसुदा तयार करण्यात आला. त्यावर विविध बिगर शासकीय संस्था, नागरिकांकडून जवळपास १२ हजार सूचना व हरकती पालिकेला प्राप्त झाल्या. निवडणुकीच्या काळात या अहवलावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता असल्याने सत्ताधारी पक्षांनी हा अहवाल लांबणीवर टाकला होता. हा अहवाल मंजूर होऊन राज्य सरकारकडे पाठविण्याची अंतिम मुदत २० मार्च २०१७ पर्यंत होती. ती वाढवून १९ मे करण्यात आली होती.त्यानुसार या मुदतवाढीची वेळ संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र विकास आराखड्याचा मसुदा ३ मे रोजी हाती पडल्याची तक्रार अनेक नगरसेवकांनी केली. त्यामुळे मसुद्याला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची उपसूचना सभागृह नेते यशवंत जाधव यांनी पालिकेच्या महासभेत केली. तर मसुद्यातील मुद्दे नगरसेवकांना समजावण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करावी, अशी सूचना भाजपने केली. ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे १९ जुलैपर्यंतची मुदत नगरसेवकांना मिळाली आहे.