शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुंबईचे साहेब टून्न !

By admin | Updated: December 10, 2014 00:48 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली

रात्रभर गोंधळ - कर्मचाऱ्यांना मारहाण नरेश डोंगरे - नागपूरविधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली आणि नोकरीहून काढून टाकण्याचीही धमकी दिली. शिपायापासून शीर्षस्थापर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याने या प्रकाराचा निषेध नोंदविला असून, संबंधित उच्चाधिकाऱ्याच्या हा प्रताप चर्चा आज दिवसभर प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकार सध्या नागपुरात आले आहे. अर्थात सर्वच खात्याचे उच्च अधिकारीही नागपुरात मुक्कामी आहेत. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘या’ उच्चाधिकाऱ्याची निवास व्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेच्या दीक्षाभूमीजवळच्या गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे. उच्चपदस्थ असल्यामुळे अर्थातच त्यांच्या दिमतीला शासकीय नोकरदारांचीही व्यवस्था आहे. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास हे अधिकारी महाशय निवासस्थळी पोहचले. प्रारंभी बाथरूम स्वच्छ नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली. काही वेळेनंतर गरम पाण्याची व्यवस्था नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. साहेब ‘तर्र’ असल्यामुळे त्यांना कुणी समजावण्याच्या भानगडीत पडले नाही. एका कर्मचाऱ्यानेनिवासाच्या ठिकाणच्या सोयी सुविधा आपल्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे सांगितले असता या अधिकाऱ्याने त्याला चक्क मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिथरलेल्या या उच्चाधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतले. पहाटे ३ पर्यंत त्याचा गोंधळ सुरू होता. नाश्त्यासाठी उद्धार सकाळी चांगल्या दर्जाचा नाश्ता तातडीने मिळाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचाही या ‘साहेबांनी’ उद्धार केला. साहेबांकडून होत असलेला अपमान असह्य झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे फोनवरून तक्रारवजा माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या खात्याच्या उच्चाधिकाऱ्यांना ही माहिती कळवली. दुपार झाली तरी साहेब शांत व्हायचे नाव घेत नसल्यामुळे कर्मचारी-अधिकारी संतप्त झाले. त्यांच्या निषेधाचे सूर कर्णोपकर्णी मंत्रालयात पोहचले. सायंकाळी कामगार मंत्री प्रकाश मेहता आणि त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या संतापजनक प्रकरणाची माहिती पोहचल्याचे सांगितले जाते. वरिष्ठांची धावपळ प्रकरण मंत्रालयात पोहचल्यामुळे प्रशासनाची धावपळ वाढली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच ‘घटनास्थळ’ गाठून संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘साहेब’ मोठे असल्यामुळे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना ‘त्यांनी’ घातलेल्या गोंधळाची माहिती मंत्रालयात पोहचल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचा उलट परिणाम झाला. तक्रार करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी या उच्चाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे कर्मचारी-अधिकारी अधिकच संतप्त झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये, हा गोंधळ बाहेर चर्चेला येऊ नये म्हणून सर्वच संबंधितांना गप्प राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.