शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

"'मातोश्री'वर बैठक, तिकीट फायनल झालं, गावाकडं आलो अन् उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:50 IST

रविकांत तुपकर नको यासाठी पक्ष सोडून काही जण एकत्र आले. असुरक्षेच्या भावनेतून माझं तिकीट कापण्यात आले. त्याचा आसुरी आनंद काहींनी घेतला. संजय गायकवाडांनी जो घटनाक्रम सांगितला तो सत्यच आहे अशी पुष्टीही रविकांत तुपकरांनी केली.

बुलढाणा - महाविकास आघाडीसोबत जावं ही आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती. माझं तिकीट फायनल झालं होतं ही खरी गोष्ट आहे. त्या अनुषंगाने आमच्या बैठका झाल्या. उद्धव ठाकरेंसोबत ५-६ बैठका झाल्या. आम्ही त्यांच्यासोबत यावं ही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचीही इच्छा होती. मविआत जाण्यासाठी काँग्रेस, शरद पवारांसोबत मिटिंग झाली, उद्धव ठाकरेंसोबत जास्त मिटिंग झाल्या. माझी उमेदवारी फायनल झाली परंतु अचानक उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असा गौप्यस्फोट शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. 

रविकांत तुपकर यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून फायनल होती परंतु प्रतापराव जाधव आणि संजय कुटे यांनी खेळी करून तुपकरांचे तिकीट कापले. अनिल परब आणि नार्वेकरांसोबत त्यांची बैठक झाली होती असा दावा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यावरून रविकांत तुपकरांनी चर्चेवेळी काय घडले त्याचा खुलासा केला आहे. रविकांत तुपकर म्हणाले की, आमच्या शेवटच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, तेजस ठाकरे, विनायक राऊत, मी आणि उबाठाचे जिल्हाप्रमुख होते. रविकांतला तिकीट द्यायचं ठरलं, मला सांगण्यात आले, तुम्ही गावाकडे जा, कार्यकर्त्यांची बैठक घ्या त्यांच्यासमोर घोषणा करा. त्यानंतर मातोश्रीवर या, आपण संयुक्तिकपणे शेतकरी संघटनेचे आणि शिवसेनेची युती झाल्याचं जाहीर करू. एबी फॉर्म मात्र तुम्ही आमचा घ्यायचा हे ठरले. मी गावाकडे आलो आणि दुसऱ्या दिवशी मला दिलेला शब्द अचानक उद्धव ठाकरेंनी फिरवला असं त्यांनी सांगितले. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच मला उमेदवारी मिळू नये यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षातील लोक कामाला लावले. माझ्याबद्दल प्रतापराव जाधवांना रागच आहे. २०१९ ला मी त्यांच्याविरोधात प्रचार केला. आताची निवडणूक मी त्यांच्याविरोधात लढलोय. त्यांच्या मनात राग असणं स्वाभाविक आहे. त्यांनी काहींना मातोश्रीला पाठवले. त्यानंतर मला दिलेला शब्द उद्धव ठाकरेंनी फिरवला गेला. मला सांगितले, महाविकास आघाडीला पाठिंब्याची घोषणा करू नका. तुमची बैठक रद्द करा. मी म्हटलं, बैठक रद्द होऊ शकत नाही. २७ जिल्ह्यातील लोकांना बोलावलंय, मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी मातोश्रीला बोलावले. आमचे पदाधिकारी राजीनामा देण्याची भाषा करतायेत वैगेरे कारणे दिली. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदारही यात होते, ज्यांनी माझी उमेदवारी नको होती. रविकांत तुपकर नको यासाठी पक्ष सोडून काही जण एकत्र आले. असुरक्षेच्या भावनेतून माझं तिकीट कापण्यात आले. त्याचा आसुरी आनंद काहींनी घेतला. पैशाचं माहिती नाही, परंतु संजय गायकवाडांनी जो घटनाक्रम सांगितला तो सत्यच आहे अशी पुष्टीही रविकांत तुपकरांनी केली. 

संजय गायकवाडांनी काय दावा केला होता?

रविकांत तुपकरांचा एबी फॉर्म तयार होता, परंतु बुलढाण्यातील काहींनी मातोश्रीवर १० खोके पोहचवले आणि त्याचा पत्ता कट झाला असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला होता. त्यावरून रविकांत तुपकरांनी हा खुलासा केला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ravikant Tupkarरविकांत तुपकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Gaikwadसंजय गायकवाडPrataprao Jadhavप्रतावराव जाधवShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी