शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, पण आता मुंबईला वाली राहिला नाही”; अंबादास दानवेंची टीका
2
"४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर ...", शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा
3
“गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले
4
पाकिस्तानच्या शेअर बाजाराच्या इमारतीला आग; ८०००० च्या उच्चांकावर असताना व्यवहार केले बंद
5
केळी + दूध = आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे का आहे बॅड कॉम्बिनेशन?
6
विश्वविजेत्या Team India ला मिळालेल्या बक्षिसाचे 'भारी' वाटप; इतर कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ!
7
Rakhi Sawant : राखी सावंत आता कधीच होऊ शकत नाही आई! म्हणाली - "आतून खूप वेदना आहेत पण..."
8
मुंबईवर एवढा पाऊस का कोसळला? जे सिंधुदूर्ग, रत्नागिरीत घडले, तेच... हवामान विभागाने कारण सांगितले
9
'वरुण' पाऊस कोसळतोय, दुपारी समुद्राला भरती; पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईचे तळे होणार?
10
'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता
11
एकच साप सहा वेळा चावला, पिच्छा सोडविण्यासाठी तरुण मावशीकडून काकाकडे गेला, तिथेही...
12
कांदा, दूध दरवाढीचे खासदार निलेश लंके यांचे आंदोलन स्थगित
13
मंत्री अन् आमदारांना पावसाचा फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅक वरून पायी प्रवास
14
“तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू”; शरद पवारांचा कुणाला शब्द?
15
रायगडावर पर्यटनासाठी जायचा प्लॅन असेल तर थांबा! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
16
Mumbai Weather Forecast: मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार; असा आहे हवामान खात्याचा अंदाज
17
अंगारकी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा गणपती बाप्पाचे विशेष पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
18
Jagannath Yatra: पुरीच्या जगन्नाथाला एकादशीच्या दिवशीसुद्धा भाताचा नैवेद्य चालतो; वाचा त्यामागील कथा!
19
Vishal Pandey : बिग बॉसमध्ये विशालला मारहाण; आईला आलं रडू, बाबांनी जोडले हात, म्हणाले, "माझा मुलगा..."
20
Karan Johar Kids: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो? मुलांच्या प्रश्नांमुळे करण जोहर हैराण; म्हणाला...

योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर माझा भर असेल - सुजाता सौनिक

By यदू जोशी | Published: July 01, 2024 10:09 AM

कुटुंबापासूनच प्रशासनाची ओळख होत गेली, पुढे त्यातच संधी मिळाली... वैभवशाली परंपरा समोर नेण्याचा, प्रशासन अधिक गतिमान करण्याचा असेल प्रामाणिक प्रयत्न...

यदु जोशी 

मुंबई : महाराष्ट्राला अत्यंत आदर्श अशा प्रशासनाची प्रदीर्घ परंपरा आहे, या परंपरेची पाईक होण्याची संधी मला मिळाल्याचा अत्यानंद होत आहे. समाजातील विविध घटकांसाठी असलेल्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ हा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासन अधिक गतिमान करण्यावर माझा भर असेल, अशी भावना नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व्यक्त केली. 

मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’शी त्यांनी बातचित केली. महाराष्ट्राच्या प्रशासन व्यवस्थेबद्दल देशभर अत्यंत आदराने बोलले जाते. प्रशासनाची ही वैभवशाली परंपरा त्याच पद्धतीने समोर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्कीच करेन. प्रशासन संस्कृतीतच मी वाढले आहे. माझे बरेच नातेवाईक प्रशासकीय अधिकारी राहिले आहेत. माझे आजोबा नागपूरला रेल्वेचे मोठे अधिकारी होते. माझी मावशी आशा सिंग ही प्रशासनात ज्येष्ठ अधिकारी होती. दुसरी मावशी राणी जाधव या आयएएस अधिकारी होत्या. अनेक पदे त्यांनी भूषविली. पती मनोज सौनिक तर मुख्य सचिव राहिले. थोडक्यात मला कुटुंबापासूनच प्रशासनाची ओळख होत गेली आणि पुढे त्यातच संधी मिळाली. 

इतकी वर्षे प्रशासकीय कामकाज करताना आलेल्या अनुभवाचा आता मुख्य सचिव म्हणून महाराष्ट्राला फायदा करून देण्याचे मनात आहेच. महाराष्ट्राच्या प्रशासनातील सर्वच अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि माध्यमे मला निश्चितपणे सहकार्य करतील, असा आपल्याला विश्वास असल्याचे सुजाता सौनिक म्हणाल्या.  

एकमेकांचा सन्मानमाझे पती मनोज सौनिक मुख्य सचिव झाले, आता मला ही संधी मिळाली आहे. खासगी आयुष्य आणि प्रशासकीय कर्तव्य या दोन्ही गोष्टींची आम्ही कधीही गल्लत होऊ दिली नाही. इतक्या वर्षांमध्ये एकमेकांच्या प्रशासकीय कामामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यांनी मला माझ्या खात्याशी संबंधित कोणतेही काम कधी सांगितले नाही आणि मी देखील त्यांना तसे कधी म्हणाले नाही. खासगी आणि प्रशासकीय आयुष्यात एकमेकांचा सन्मान आम्ही नेहमीच केला आहे.  -सुजाता सौनिक, मुख्य सचिव 

कर्तव्यकठोर अधिकारीमुख्य सचिवपदाची मला तर संधी मिळालीच; पण त्याहीपेक्षा पत्नीला आज संधी मिळाली याचा आनंद कितीतरी जास्त आहे. सुजाता कर्तव्यकठोर अधिकारी आहे आणि ती तेवढीच संवेदनशीलही आहे. तिच्या या स्वभावगुणांचा मुख्य सचिव म्हणून काम करताना तिला आणि महाराष्ट्रालाही निश्चितच फायदा होईल, असे मला वाटते.    -मनोज सौनिक, माजी मुख्य सचिव