शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Nagar Panchayat Election Result 2022: आघाडीतील बिघाडी भाजपच्या पथ्यावर! नगरपंचायतीत काँग्रेसला फटका; १०० जागा घटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 11:20 IST

Nagar Panchayat Election Result 2022: काँग्रेसच्या कमी झालेल्या जागा भाजप आणि शिवसेनेने पटकावल्या

- अतुल कुलकर्णीमुंबई : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. मागील जागांच्या तुलनेत काँग्रेसच्या १०० जागा घटल्याचे अंतिम निकालात स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या कमी झालेल्या जागा भाजप आणि शिवसेनेने पटकावल्या आहेत.राज्यात यावर्षी पाली,  देहू, महाळूंग-श्रीपूर, वैराग, नातेपुते आणि तीर्थपुरी अशा सहा नगरपंचायत नव्याने निर्माण करण्यात आल्या. त्या ठिकाणी प्रथमच मतदान झाले. राहिलेल्या १०० नगरपंचायत जुन्याच होत्या. २०१४ ते २०१६ मध्ये तेथे निवडणुका झाल्या होत्या. यापूर्वीचे संख्याबळ बघितल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी ज्या काळात सत्तेत नव्हती त्यावेळी त्यांना यश मिळाले होते. मात्र आता सत्ता मिळूनही काँग्रेसला मागच्या जागा टिकवता आल्या नाहीत.  काँग्रेसने स्वबळाची भाषा सुरुवातीपासून लावून धरली होती. निकालानंतरही माजी प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याचे समर्थनच केले. आज जरी आमचे नुकसान झाले असले तरी भविष्यात त्याचा राजकीय फायदाच होईल, असेही ते म्हणाले. मात्र  प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नाना पटोले यांनी सतत केलेली वादग्रस्त विधाने पक्षालाच अडचणीची ठरली. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती आणि नाही. जबाबदारी घेण्याची तयारीही नाही. काँग्रेसचा एक मोठा वर्ग ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या विचाराचा होता. पण स्वबळाच्या सततच्या घोषणा आणि त्यावरून आघाडीत होणारी नाराजी यामुळे तोही वर्ग फारसा सक्रिय झाला नाही. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह मंत्री विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांनी आपापले जिल्हे सांभाळले. त्यामुळे काँग्रेसची पडझड थांबवण्यास मदत झाली. अन्यथा काँग्रेसला आणखी मोठा फटका बसला असता. काँग्रेसमध्ये एकवाक्यता नव्हती तशीच स्थिती महाविकास आघाडीमध्येही होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. पण तो काही कारणाने मान्य होऊ शकला नाही, असे स्वत: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. पण आघाडी का झाली नाही हे त्यांनी सोयीस्कररीत्या सांगण्याचे टाळले. याच बिघाडीचा फायदा भाजपने उचलला. गेल्या वेळेच्या तुलनेत तब्बल ७४ जागा जास्तीच्या मिळवल्या. शिवसेनेच्या मदतीला उद्धव ठाकरे यांची प्रतिमा आली. शिवसेनेत जरी सुंदोपसुंदी असली तरी ती बाहेर आली नाही. त्याचा फायदा शिवसेनेला तब्बल ९४ जागा जास्तीच्या मिळवता आल्या. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्याचाही फायदा सेनेला झाला.  पण तिघांनी एकत्रित निवडणूक लढविली असती तर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी चांगले वातावरण तयार झाले असते. भाजपच्याही जागा कमी करता आल्या असत्या. पण ही संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घालवली.पक्ष      २०१४-१६    २०२१     (-/+)काँग्रेस     ४४५     ३४४    - १००भाजप     ३४५     ४१९       +७४राष्ट्रवादी      ३३६     ३८१    +४५शिवसेना    २०४     २९६     +९२इतर     ३७२     ३५१    - २१

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस