शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

नळपाणी योजनेचे काम १० वर्षांनंतरही अपूर्णच!

By admin | Published: April 06, 2017 3:21 AM

तालुक्यातील बुधावली ग्रामपंचायत हद्दीतील काटी या गावाच्या नळपाणी योजनेचे काम गेली दहा वर्षे अपूर्णच असल्याने नागरिकांची पाण्यासाठीची वणवण सुरुच आहे

वसंत भोईर,वाडा- तालुक्यातील बुधावली ग्रामपंचायत हद्दीतील काटी या गावाच्या नळपाणी योजनेचे काम गेली दहा वर्षे अपूर्णच असल्याने नागरिकांची पाण्यासाठीची वणवण सुरुच आहे. येथे ‘भारत निर्माण वर्धित वेग’ या योजनेतून वर्ष २००७ - २००८ मध्ये नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यासाठी १५ लाख ८१ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन ग्रामपंचायत पाणी पुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेचे काम हाती घेतले होते. विहीर, पाण्याची टाकी, पंप हाऊस व काही ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली असून उर्वरीत कामे गेली दहा वर्षानंतरही अपूर्ण आहेत. झालेल्या कामासाठी ११ लाख ८६ हजारांचा खर्च करण्यात आला असतांनाही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा अद्यापही उतरलेला नाही. योजना वापरात नसल्याने पाईपलाईन खराब झाली आहे तसेच पाण्याच्या टाकीचीही दुरवस्था झाली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी याबाबत वाडा पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार करून तत्कालीन ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. परंतू त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. >या पाणी योजनेबाबत नुकतीच सुनावणी घेण्यात आली असून संबंधितांना ती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तिचे काम लवकर पूर्ण न केल्यास कारवाई करण्यात येईल. - पी. एस .कुलकर्णी, उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग वाडा ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष संजय पाटील व सचिव सुनिता हरड यांना योजना पूर्ण करण्याच्या सूचना लेखी स्वरूपात दिल्या होत्या. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. - पूनम दोंदे, ग्रामसेविका, बुधावली ग्रामपंचायत