शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

नंदूरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात अद्यापही विजेची प्रतिक्षा

By admin | Published: August 30, 2016 7:13 PM

नंदूरबार जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांमध्ये अद्यापही वीज पोहचलेली नसल्याची स्थिती आहे

- मनोज शेलार / ऑनलाइन लोकमत 
४५ गावे ९६८ पाड्यांमध्ये काळोख
नंदूरबार, दि. 30 -  जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांमध्ये अद्यापही वीज पोहचलेली नसल्याची स्थिती आहे. या गावांमध्ये सरदार सरोवर प्रकल्पाअंतर्गत बुडीत क्षेत्रातील ३३ गावे व १७६ पाड्यांचाही समावेश आहे. 
 
नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्युतीकरण करण्यासाठी मोठी कसरत होत आहे. अद्यापही सातपुड्यातील दुर्गम भागातील तब्बल ४५ गावे व ९६८ पाडे विद्युतीकरणापासून वंचीत आहेत. या ठिकाणी प्रशासनाने सौरदिवे बसविले आहेत. परंतू त्यांचीही लाईफ अवघी एक ते दीड वर्ष राहत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे अद्यापही ही गावे काळोखातच आहेत. जिल्ह्यातील ९३० गावांपैकी ८८५ गावांचे विद्युतीकरण झालेले आहे. दोन हजार ९९१ पाड्यांपैकी २०२३ पाड्यांपर्यंत वीज पोहचली आहे. ४५ गावे व ९६८ पाड्यांना वीजेची प्रतिक्षा असून त्यात बुडीत क्षेत्रातील ३३ गावे, १७६ पाडे, बुडीत क्षेत्राव्यतिरिक्त १२ गावे व ७६३ पाड्यांचा समावेश आहे. विविध योजनांच्या माध्यमातून २०१६ अखेर १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. उर्वरित गाव व पाड्यांच्या विद्युतीकरणासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे.
 
विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युती करण्यात येत असून त्यात डीपीडीसीच्या माध्यमातून २०१४-१५ मध्ये ४५ पाडे, २०१५-१६ मध्ये ५२ पाडे, त्याचवर्षी आदिवास उपयोजनेतून १२ गावे व ६० पाडे तर वनबंधू योजनेतून ४८ पाड्यांमध्ये तब्बल ४४ कोटी ८६ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 
मोबाईल रेंज पोहचली, पण वीज नाही
विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांपर्यंत मोबाईलची रेंज पोहचलेली आहे. परंतू वीज पोहचलेली नसल्याचे विरोधाभास निर्माण करणारे चित्र देखील सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात पहावयास मिळते. भारत संचार निगम अर्थात बीएसएनएलचे अनेक गावात मोबाईल टॉवर आहेत. त्या माध्यमातून दऱ्याखोऱ्यातील बऱ्याच गाव, पाड्यांपर्यंत मोबाईल रेंज पोहचत आहे. त्याचा चांगला परिणाम दळणवळण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी होत आहे. परंतू अशा ठिकाणी वीज पोहचलेली नसल्यामुळे गावकऱ्यांना जवळच्या बाजारपेठेच्या गावात जावून तेथे किमान पाच रुपये ते २० रुपये देवून मोबाईल चार्जिंग करून घ्यावा लागतो. धडगाव, मोलगी या गावांमध्ये हे प्रकार सर्रास पहावयास मिळतात.