शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"संविधानाबाबत मोदींनी खुलासा केला पण लोकांच्या डोक्यात..."; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 18:57 IST

लोकसभेच्या निकालाबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी संविधान बदलाच्या चर्चेचा फटका बसल्याचे मान्य केले.

Chhagan Bhujbal : भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेलं नाही. २४० जागांसह भाजप लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, भाजपला ३७०  आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळवण्यात सपशेल अपयश आले आहे. इतर कोणत्याही कारणांपेक्षा, चार सौ पार या घोषणेने भाजपचे सर्वाधिक नुकसान केले. पक्षांच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान ही घोषणा मतदारांना पटवून देण्यासाठी संविधान बदलण्यासाठी आम्हाला ४०० जागांची गरज आहे, असं म्हटलं होतं. यामुळे भाजपला याचा जबर फटका बसला. आता घटना बदलणार या कथानकाचा फटका बसल्याची कबुली मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यघटना बदलण्याबाबत भाजप नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांचा फटका पक्षाला सहन करावा लागला. या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडले आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान संविधान बदलणार असा समज झाल होता असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत होते.

"पंतप्रधान मोदी यांनी टीव्हीवर त्याबाबत १५ मिनिटे मी संविधान बदलणार नाही असा खुलासा केला. पण तोपर्यंत लोकांच्या डोक्यात घुसलं होतं की ४०० पार म्हणजे आमचा बेडा पार. हे सगळ्यांच्या डोक्यात गेले. दोन्ही समाजाची लोकसंख्या एका बाजूला गेली तर आपलं काय. आदिवासी समाज सुद्धा या गोष्टीला घाबरला. संविधान बदलल्यानंतर आरक्षण जाणार हे सगळ्यांच्या डोक्यात आलं. तसे काही करणार नाही आहेत पण लोकांचा समज झाला. आपलं नुकसान कसे होईल त्या पद्धतीने विरोधी पक्षाने काम केलेच असणार. आपण शेवटी त्यात काही सुधारणा करु शकलो नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आता विधानसभेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये संविधानाचा काही प्रश्न नाही. संविधान बदलायचा प्रचार लोकसभेच्या निवडणुकीत झाला. आपले दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी हे मतदार परत मिळवावे लागतील. कोण काय म्हणते ते बाजूला राहूद्या," असे छगन भुजबळ म्हणाले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा