शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नरेंद्र मोदी लोकांची मनं जिंकलेले नेते; उदयनराजेंची स्तुतीसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 22:18 IST

खासदार उदयनराजेंकडून मोदींचं कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांची मनं जिंकलेली नेते असल्याचे कौतुकोद्गार राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले. 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उदयनराजेंनी विविध मुद्द्यांवर आणि व्यक्तींवर भाष्य केलं. राजकारणातील दिग्गजांबद्दल काय वाटतं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मोदींचं कौतुक केलं. उदयनराजे यांना देशातील आणि राज्यातील विविध राजकारण्याविषयी काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्याचं ते म्हणाले. त्यांनी लोकांची मनं जिंकली, असंदेखील त्यांनी सांगितलं. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनीदेखील लोकांची मनं जिंकल्याचं उदयनराजे म्हणाले. पुढे मोदींबद्दल हाच प्रश्न विचारताच उदयनराजेंनी तेच उत्तर दिलं. 'मोदींनीदेखील लोकांची मनं जिंकली. जे आहे ते आहे,' असं उदयनराजे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार माझे चांगले मित्र असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पक्षाला राष्ट्रीय राजकारणात गरज असल्याचं ते म्हणाले. तर काँग्रेस अध्यक्ष चार्मिंग आणि हँडसम असून ते नक्कीच चांगलं काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाला संकटात एकसंध ठेवण्याचं काम केल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंना चिमटा काढला. मिर्झा गालिबनंतर कोण असतील, तर ते आठवले, असा टोला उदयनराजेंनी काढला.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारRahul Gandhiराहुल गांधी