शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

नाशिकच्या संजीवनी जाधवची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2016 6:17 AM

ठाणे महापालिकेच्या वतीने रविवारी पार पडलेल्या २७ व्या ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात नाशिकच्या संजीवनी जाधवने १५ किमीची शर्यत ५३ मिनिटे ५६ सेंकदात पूर्ण करत बाजी मारली

महेश चेमटे,  ठाणेठाणे महापालिकेच्या वतीने रविवारी पार पडलेल्या २७ व्या ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात नाशिकच्या संजीवनी जाधवने १५ किमीची शर्यत ५३ मिनिटे ५६ सेंकदात पूर्ण करत बाजी मारली. तर मोनिका आथरेला ५४ मिनिटे ३९ सेंकद या वेळेसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नागपूरच्या ज्योती चव्हाणने ५९ मिनिटे ३७ सेंकद अशी वेळ नोंदवत महिला गटात तिसऱ्या स्थानी झेप घतेली. त्याचवेळी पुरुष गटात अव्वल १० क्रमांकामध्ये ८ पुणेकरांनी स्थान मिळवताना वर्चस्व राखले.दरम्यान, महिला धावपटूंनी व्यक्त केलेल्या निराशेनंतर महापौर संजय मोरे यांनी आगामी ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये महिलाही २१ किमी धावणार आहेत. शिवाय महिला मॅरेथॉनची अंतिम रेषा देखील महापालिकाभवन येथेच होईल अशी माहितीही मोरे यांनी दिली.यंदाच्या मॅरेथॉनमध्येच हा बदल करण्यात येणार होता. मात्र मार्ग निश्चित झाले होते. शिवाय खेळाडूंच्या प्रवेशिका देखील आल्या होत्या. त्यामुळे आगामी मॅरेथॉनमध्ये हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली. त्याचवेळी पुरुषांच्या २१ किमी अंतराच्या शर्यतीमध्ये पुणेकरांचे एकहाती वर्चस्व दिसून आले. पुण्याच्या कालिदास लक्ष्मण हिरवेने १ तास ७ मिनिटे ४ सेकंद अशी विजयी वेळ नोंदवताना जेतेपदावर नाव कोरले. तर प्रथमच मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या दुर्गा बहादूर बुधा याने अनपेक्षित कामगिरी करताना १ तास ७ मिनिटे ५ सेंकद अशी वेळ नोंदवत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. चंद्रपूरच्या आर.एस.एस.एम महाविद्यालयातील पवन देशमुखने (१ तास ८ मिनिट) तिसरे स्थान पटकावले. दिग्गजांची हजेरी रिओ आॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणारी धावपटू ललिता बाबर, रोईंग खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणारा दत्तू भोकनाळ यांची उपस्थिती यावेळी लक्षवेधी ठरली. त्याचवेळी रिओ आॅलिंपिक कांस्यपदक विजेती मल्ल साक्षी मलिकची फिजिओथेरेपिस्ट ॠचा कशाळकर यांनीही धावपटूंचा उत्साह वाढवला.जनतेसमोर मिळालेले बक्षीस प्रेरणादायीया मॅरेथॉनमध्ये यापुर्वी एक स्पर्धक म्हणून आलेल्या ललिताला आज प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले याचा खूप अभिमान वाटतो. मॅरेथोन बक्षीसांच्या रोख पुरस्कारांमध्ये वाढ झाल्यास त्याचा फायदा धावपटूंना होईल. जनतेसमोर मिळालेले बक्षीस हे नेहमीच प्रेरणादायी ठरते. - मोनिका आथरेदुसऱ्यांदा या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्याचा खूप आनंद आहे. स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवण्याचा मानस होता, मात्र अंतिम टप्प्यात शिल्लक अंतराचा अंदाज आला नाही. धावपटू अंतिम रेषा समोर ठेवून धावत असतो त्यामुळे अंतर दर्शक फलक दर्शनी भागात असते तर, विक्रमी वेळ नोंदवता आली असती. - संजिवनी जाधव, विजेती